मुंबई : देशातील भाजपकडे केंद्रीय तपास यंत्रणा आणि पैसा मोठ्या प्रमाणात असून ते लोक विकत घ्यायला निघायले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांचा विजय होणे अशक्य आहे. त्यामुळे भाजप ज्या पद्धतीचं वातावरण तयार करत आहेत. त्याचा पुढे परिणाम त्यांना भोगायला लागणार आहेत. असा इशारा नाना पटोले यांनी भाजपला दिला आहे.
“मोदींपेक्षा कोणी मोठं नाही, त्यांनीच अजित दादांनी पहिले बोलावं असं म्हटलं होतं”
राज्यात जो केंद्रीय तपास यंत्रणांचा उद्रेक होत चालला आहे. त्याची माहिती राज्यपालांनी तातडीने राष्ट्रपती यांना द्यावी. केंद्रीय तपास यंत्रणांचा चुकीचा वापर त्यांनी थांबावयाला लावला पाहिजे. त्याचबरोबर भाजपकडून जे काही सुडबुद्धीचे राजकारण सुरू आहे. त्याला कुठंतरी लगाम लावला पाहिजे. जर असं झालं नाहीतर जनतेचा यांना धडा शिकवेल, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
“मी आमदार नाही, मंत्री आहे, हा प्रश्न त्यांना विचारा”; बच्चू कडूंचं ‘त्या’ प्रश्नांवर तिखट उत्तर
केंद्र सरकारकडून राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा उद्रेक म्हणून आज रस्त्यावर मोठ्या संख्येने लोक उतरली आहेत. हे आंदोलन लोकशाही वाचवण्यासाठी होत असून भर उन्हात राजभवनाकडे चालेले हे आंदोलन महाराष्ट्रातच नाही तर संपुर्ण देशभरात होत आहे. असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
राजकीय मानपानाच्या नाट्यात देहू संस्थानची प्रतिमा मलीन; अजित पवार यांच्याकडून अद्यापही मौन
दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी यांची इडीकडून चौकशी केली जात आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधात आज काॅंग्रेसने मुंबईत आंदोलन केले. यावेळी काॅंग्रेसच्या अनेक नेत्यांना पोलिसांना ताब्यातही घेतले. यामध्ये नाना पटोले, बाळासाहेब यांचा सहभाग होता.
Read also:
- अन् चक्क रोहित पवारांनी गौतम अदानीच्या गाडीचं सारथ्य केलं; राजकीय वर्तुळात एकच चर्चा
- “बारामती केंद्राला भेट द्याल तेव्हा विज्ञानाचे अनेक चमत्कार बघायला मिळतील”; शरद पवार
- “जलील यांनी सांगितल्यानंतर पंकजा मुंडे लगेचच पक्ष काढणार नाहीत, त्यांचा पक्ष विचार करेल” रावसाहेब दानवे
- “दोन लुटारू भाई भाई अवघा देश लुटून खाऊ”; शरद पवार, अदानी एकाच मंचावर, सदाभाऊंचा टोला
- “मुंबई महापालिका निवडणुकीत ‘मराठी मुलगी’ म्हणून प्रचार करणार”; नवनीत राणांनी पुन्हा थंड थोपटले