अमरावती : राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूलै रोजी मतदान होणार आहे. या निवणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपच्या जोरदार बैठका सुरू आहेत. राज्यसभा निवडणुकीप्रमाणे याही वेळी अपक्षांची मोठी भुमिका असणार आहे. याच पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी याबाबत भाष्य केले आहे.
“आता छोटे नवाब महाराष्ट्र भवनासाठी जागा मागणार, मग 2 वर्ष काय फक्त टोमण्यांमध्ये गेले का ?
राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे ८ आमदार फुटल्यामुळे भाजपचा तिसरा उमेदवार विजयी झाला होता. कोल्हापुरचे धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवारांवर विजय मिळवला होता. त्यानंतर मग संजय राऊतांनी या पराभावाचा खापर अपक्ष आमदारांवर फोडलं होतं. त्याचबरोबर संजय राऊतांनी त्यांची नावे देखील उघड केली होती.
“अयोध्येत महाराष्ट्र सदन होण्यासाठी योगींशी चर्चा करणार”; आदित्य ठाकरेंनी घेतलं रामलल्लाचं दर्शन
यातच भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते की, या सरकारवर काही आमदार नाराज आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील नाराज आमदार आम्हाला मत देतील. यावर बच्चू कडू यांना विचारले असता, ते म्हणाले की, मी आमदार नाही, मंत्री आहे. हा प्रश्न आमदारांना विचारा, असं खोचक उत्तर बच्चू कडू यांनी दिला आहे. बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले अपक्ष आमदार आहेत. त्यांनी महाविकास आघाडीला आपला पाठिंबा या अगोदरच जाहीर केला आहे.
“ठाकरे सरकारच पाण्याचे शत्रू , यांनी सिंचन योजनांचा खून केला”; फडणवीसांचा जालन्यात एल्गार
दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीकरीता महाविकास आघाडीतील सर्व आमदारांना आता रेनाॅसा हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याआधी राज्यसभेच्या निवडणुकीकरीता त्यांना ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यामुळे आता विधान परिषदेच्या निवडणुकीत दहाव्या जागेवर कोणला संधी मिळतेय ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- राजकीय मानपानाच्या नाट्यात देहू संस्थानची प्रतिमा मलीन; अजित पवार यांच्याकडून अद्यापही मौन
- “ओबीसी, मराठा आरक्षणाचं वाट्टोळ करणाऱ्या प्रस्थापितांची हीच खरी वृत्ती”; पडळकारांचा सुप्रिया सुळेंवर टिकास्त्र
- “आपल्याला देव पावला, नाहीतर आपल्या देखील 60 टक्के जागा कमी झाल्या असत्या”; सुप्रिया सुळे
- “इंग्रज सरकारपेक्षाही वाईट सरकार केंद्रात, आम्ही यांना घाबरत नाही”; नाना पटोले
- राष्ट्रपती निवडणुक ! शरद पवारांनी नकार दिल्यानंतर ममता बॅंनर्जींनी सुचवली ही नावं