अयोध्या : उत्तर प्रदेशात महाराष्ट्र सदन होण्यासाठी आमचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहेत. महाराष्ट्रातील खुप लोक अयोध्येत येत असतात. त्यामुळे अयोध्येत 100 ते 200 खोल्यांचं महाराष्ट्र सदन होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज अयोध्येत सांगितले. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील अनेक शिवसैनिक अयोध्यामध्ये दाखल झाले आहेत.
“पंकजाताई माझी मोठी बहिण, कोणीही मुर्खपणा करू नये”; निलेश राणेंनी भाजपच्याच नेत्याला खडसावलं
शिवसेनेचे राजकारण हे सरळ सरळ आहे. आमचं हिंदुत्व स्वच्छ आहे. रघुकूल रीत सदा चली आयी, प्राण जाये पर वचन ना जाये, निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासनं आम्ही पाळतो. जिंकलो हरलो तरी आम्ही वचन पाळतो, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. उत्तर प्रदेशात महाराष्ट्र सदन होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कारण महाराष्ट्राती खुप लोक अयोध्यामध्ये येत असतात, त्यामुळे आम्ही योगींशी बोलणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितले.
“फडणवीससाहेबांचा मुख्यमंत्री होण्याचा आजार फार गंभीर झालाय, त्यांना उपचाराची गरज”; रूपाली पाटील
उत्तर प्रदेशमधील जनतेची इतरांबाबत कशी भूमिका आहे याबाबत मी काही बोलणार नाही. त्यांनी आमचं स्वागत केलं. कोरोनाच्या काळात महाराष्ट्राने सर्वांना समान वागणुक आणि प्राधान्य दिलं. इथे कोण कोणाचं स्वागत करतंय कोण विरोध करतंय यापेक्षा मंदिर निर्माण चांगलं व्हाव आणि त्यासाठी महाराष्ट्र सदन व्हानं अशी आमची इच्छा आहे. असंही ते म्हणाले.
“नरेंद्र मोदी उत्तम नेते नसले तरी उत्तम अभिनेते”; राष्ट्रवादीची खोचक प्रतिक्रिया
दरम्यान, राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यासाठी शिवसेनेकडून अयोध्यामध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे. या दौऱ्यानिमित्ताने आदित्य ठाकरे रामलल्लाची आरती. पत्रकार परिषद, आणि इस्कॉन मंदिराला भेट देणार असा भरगच्च कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यासाठी नाशिक, पुणे आणि मुंबईतून हजारो शिवसैनिक अयोध्यामध्ये दाखल झाले आहेत.
Read also:
- “ठाकरे सरकारच पाण्याचे शत्रू , यांनी सिंचन योजनांचा खून केला”; फडणवीसांचा जालन्यात एल्गार
- संभाजी राजेंनी केलं मावळ्यांना ‘हे’ आव्हान; जनतेच्या मनातील बोधचिन्ह साकारणार
- “भाजपने हर्षवर्धन पाटलांना इडीसाठी ब्रँड अँबॅसिडर बनवावा”; काॅंग्रेसचा भाजपला खोचक टोला
- “नकली हिंदुत्वाची शाल पांघरलेल्या स्वयंघोषितांनी अयोध्येत दिसू नये हिच श्रीरामांची इच्छा”; दिपाली सय्यद
- “आदित्य ठाकरे अयोध्येला पाप धुण्यासाठी गेले”; रवी राणांचं शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल