पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल देहुत संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झाले. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण न करण्याची संधी देण्यात आली नाही. त्यावरून आता राष्ट्रवादी काॅंग्रेसने आक्रमक भूमिका घेत झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
अजितदादांना भाषण करू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान असून अतिशय वेदनादायक, अपमानकारक प्रकार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली काल पुण्यात भाजपचा निषेध देखील करण्यात आला. त्यानंतर नरेंद्र मोदी उत्तम नेते नसले तरी उत्तम अभिनेते आहेत. कार्यक्रम पत्रिकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण नाही याची कल्पना त्यांना नसेल का? तरीही बघा कशी आग्रह करण्याची नोटंकी केली. अशी खोचक टिप्पणी राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली.
वारकऱ्यांसारखेच पंतप्रधान मोदींचे काम”; देवेंद्र फडणवीसांचे देहुत गौरवोद्गार
तुकोबारायांचा “भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी हाणु माथा, “हा अभंग स्वतःवर उलटण्याची वेळ येऊ नये याची काळजी देवेंद्र फडणवीस व त्यांच्या अध्यात्माच्या नावाखाली धर्मीक द्वेष पसरवणाऱ्या आध्यात्मिक आघाड्यातील तथाकथित आचार्यांनी घ्यावी. श्री क्षेत्र देहू हे वारकरी धर्माचे पवित्र स्थळ आहे प्रधानमंत्री श्री नरेंद्र जी मोदी आज एक सामान्य वारकरी म्हणून इथे आले असतील तर “भेदाभेद भ्रम अमंगळ l” या तुकोबारायांच्या अभंगाचा त्यांना सोयीने विसर पडला व हा धार्मिक कार्यक्रम भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने राजकीय करून टाकला. असा घणाघात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी त्यांनी भाजपवर चढवला.
“बंर झालं पवार साहेबांनी माघार घेतली, नाहीतर मुख्यमंत्री म्हणाले असते, तुम्ही आमचेच राष्ट्रपती”
दरम्यान, भाजपकडून देखील याबाबत प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला लाज वाटली पाहिजे. भाषणे कुणाची व्हावीत आणि कुणाची नाहीत, यापेक्षा आमच्यासाठी वारकर्यांचा सन्मान अधिक महत्त्वाचा आहे. तो होतोय, याचा अधिक आनंद आहे. वारकर्यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकू नका, ही माझी विनंती आहे. असं प्रवीण दरेकरांनी म्हटलं आहे.
Read also:
- “सौ पाप करके बिल्ली म्याऊ म्याऊ करने अयोध्या चली”; नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना पुन्हा डिवचलं
- “वारकर्यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकू नका”; प्रवीण दरेकरांची राष्ट्रवादीवर खोचक टिप्पणी
- मोदींसमोरच औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांनी कान टोचले, म्हणाले आता मोदी है तो..;
- पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर; उद्धव ठाकरेंनी मानले मोदींचे आभार
- “फडणवीसांना बोलते करून पक्षाचा प्रचार केला, मोदीजी चुक दुरूस्त करा,” अमोल मिटकरी