पुणे : वारकऱ्यांच्या मंत्राने रंजल्या-गांजल्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारकऱ्यांसारखेच काम करत आहेत. त्यांनी वारकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. त्यांची खऱ्या अर्थाने सेवा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. असं उद्गार राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देहुत काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संत तुकाराम महाराजांच्या मंदिरांचं उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
“दुर्दैवाने देशाच्या राजकारणातून श्रीरामचं हिंदुत्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय”
आपले पंतप्रधान प्रधानसेवक म्हणून काम करीत आहेत. त्यामुळेच सबका साथ, सबका विकास, आणि सबका प्रयास हेच वारकऱ्यांचं सुत्र आहे.ज्ञानेश्वर माऊलींनी जे संपुर्ण जग आपलं आहे, असं सांगितलं त्या जगाला लसींचा पुरवठा कऱण्याचं काम मोदींनी केलं. भागवत धर्माचा विचार सामान्य माणसांपर्यत पोहाचवलं. आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मी देहुत स्वागत करतो, असंही फडणवीस म्हणाले.
“५६ इंच छातीचा दाखला देत बसण्यापेक्षा डॉ. मनमोहन सिंह यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे”
ज्ञानेश्वरांनी पाया रचला आणि तुकाराम महाराजांनी कळस रचला. समाजातील सर्व स्तरापर्यंत, बहुजनांपर्यंत भागवत धर्म पोहचवला. हे शब्दाचं धन ज्या प्रकारे त्यांनी दिलं. त्यात खुप ताकद होती. इंद्रायणीत बुडवलं की शीळेंनी बंद केले तरी ते तुकोबांचे शब्द पुन्हा वर आले आणि जना जनाला व्यापलं. त्या मार्गानी चालण्याचं काम पंतप्रधान करीत आहेत. असंही ते म्हणाले.
“मग त्यातून माघार घेता येणार नाही”; फडणवीसांनी पुन्हा राज्य सरकारला दिला इशारा
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलेल्या भाषणात संत तुकारांमांच्या अनेक अभंगांच्या ओळींचा संदर्भ दिला. देहुत पांडुरंग नांदतो. देहुत पांडुरंगांचा निवास आहे. आमि प्रत्येक जण भक्तीने ओतपोत संत स्वरूप आहे, म्हणून नागरिक, माता, भगिनींना नमन करतो. काही दिवसांपुर्वी पालखी मार्ग फार लेन करण्यासाठी उद्घाटन करण्याचा मान मला मिळाला. तीन चरणात काम पुर होईल. जवळपास 350 किमि पेक्षा जास्त अंतराचे हायवे होतील. 11 हजार कोटींपेक्षा जास्त खर्च करणार आहे. या क्षेत्राचा विकास होईल. तपस्या केली असेल ती शीळा फक्त शीळा नव्हे ती भक्ती आणि ज्ञानाची आधारभुत शीळा आहे. असं मोदींनी म्हटले.
Read also:
- “बंर झालं पवार साहेबांनी माघार घेतली, नाहीतर मुख्यमंत्री म्हणाले असते, तुम्ही आमचेच राष्ट्रपती”
- आगामी वर्षात देशात 10 लाख पद भरती; नरेंद्र मोदींनी दिले प्रशासनाला आदेश
- “पंतप्रधान नरेंद्र मोदी नोकऱ्या देत असेल तर त्यांचं पुण्यात स्वागत करेन” सुप्रिया सुळे
- “पवारांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या सरकारला कोर्टात एकपण टेस्ट शास्त्रशुद्ध पद्धतीने करता आली नाही”
- “निवडणुकीत यश मिळो ना मिळो लोकांच्या मनातील मुख्यमंत्री हे राजसाहेब ठाकरेचं”