मुंबई : आगामी लोकसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकारने देशात सुमारे 10 लाख पद भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसे प्रशासनाला आदेश दिले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे येत्या दीड वर्षात केंद्र सरकारच्या सर्व विभागांमध्ये 10 लाख पदांची भरती करण्यात येणार आहे.
“मग त्यातून माघार घेता येणार नाही”; फडणवीसांनी पुन्हा राज्य सरकारला दिला इशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयानंतर विरोधी पक्षांसह घटक पक्षांनी देखील टिका केली आहे. मोदी सरकारने मागील आठ वर्षात 16 कोटी नोकऱ्या द्यायला हव्या होत्या. त्याऐवजी आता 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या आहेत, म्हणून पाच पाच लाख नोकऱ्या देण्याचे ते बोलत आहेत. असं एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी म्हटले आहे.
केंद्रीय निवडणुक आयोग संजय राऊतांची खासदारकी रद्द करणार? दिल्लीत राजकीय हालचाली सुरू
याला 900 चुहे खाकर बिली हज को चली म्हटले जाते. आपण 50 वर्षातील सर्वात वाईट रोजगार दर अनुभवत आहोत. रूपयाचे मुल्य 75 वर्षातील सर्वात कमी आहे. ट्विटर ट्विटर खेळून पंतप्रधान किती काळ आमचे लक्ष विचलित करणार असे काॅंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे.
पंकजा मुंडेंना उमेदवारी का नाकारली? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज महाराष्ट्र दौरा असून ते दुपारी देहु येथे संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. या दौऱ्यानिमित्त बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जर तरूणांना नोकऱ्या देणार असतील नक्कीच त्यांचं पुण्यात स्वागत करेन.
Read also:
- “पंतप्रधान नरेंद्र मोदी नोकऱ्या देत असेल तर त्यांचं पुण्यात स्वागत करेन” सुप्रिया सुळे
- “पवारांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या सरकारला कोर्टात एकपण टेस्ट शास्त्रशुद्ध पद्धतीने करता आली नाही”
- “निवडणुकीत यश मिळो ना मिळो लोकांच्या मनातील मुख्यमंत्री हे राजसाहेब ठाकरेचं”
- “दुर्दैवाने देशाच्या राजकारणातून श्रीरामचं हिंदुत्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय”
- “५६ इंच छातीचा दाखला देत बसण्यापेक्षा डॉ. मनमोहन सिंह यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे”