जालना : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वात भाजपने जालन्यात जलआक्रोश मोर्चा काढला. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे देखील उपस्थित होते. औरंगाबाच्या जलआक्रोश मोर्चानंतर फडणवीसांनी यावेळी देखील सरकारवर जोरदार निशाणा साधला. तसेच या राज्यात सरकार आहेच कुठे? मुख्यमंत्री कार चालवितात आणि भगवान सरकार चालविते, असा टोला देखील त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना लगावला.
“फडणवीससाहेबांचा मुख्यमंत्री होण्याचा आजार फार गंभीर झालाय, त्यांना उपचाराची गरज”; रूपाली पाटील
महाविकास आघाडी सरकार हे सत्तेत खुश आहेत, मालपाणी कमाविण्यात खुश आहेत. हे टक्केवारीत खुश आहेत. हे वसुलीत खुश आहेत. जनतेच्या दु: खाशी काहीच लेनदेन नाही. सत्ता टिकविणे, हेच त्यांचे एकमेव ध्येय आहे. अशी टिका देखील त्यांनी केली. जलयुक्त शिवार, शेततळे अशा साऱ्या योजना यांनी बंद केल्या. सुक्ष्मसिंचनाच्या योजनांचा यांनीच खुन केला. वैधानिक विकास मंडळ बंद करून टाकले हे सरकार पाण्याचे शत्रू आहेत. असंही ते म्हणाले.
“नरेंद्र मोदी उत्तम नेते नसले तरी उत्तम अभिनेते”; राष्ट्रवादीची खोचक प्रतिक्रिया
मराठवाड्यातील एकाही शहराला पाण्याच्या अडचणी येऊ नये, म्हणून आम्ही वॉटरग्रीडची योजना तयार केली. पण, महाविकास आघाडी सरकारने योजनेला निधी देणेच बंद करून टाकले. मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीच्या योजनेचा या सरकारने मुडदा पाडला. असंही ते म्हणाले. मोर्चानंतर आयोजित सभेला रावसाहेब दानवे माजी मंत्री संतोष दानवे आमदार भास्करराव दानवे आणि इतर नेत्यांनी देखील उपस्थिती लावली.
“सौ पाप करके बिल्ली म्याऊ म्याऊ करने अयोध्या चली”; नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना पुन्हा डिवचलं
दरम्यान, काल झालेल्या कार्यक्रमात देखील राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मुख्यमंत्र्यांचे कान टोचले, या सरकारच्या काळात अनेक सिंचन प्रकल्प अपूरे असून औरंगाबाद सारख्या शहराला आठवड्यातून १ वेळा पाणी मिळतं हे दुर्दैव असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सिंह यांनी सांगितले. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या सभेत पाणी प्रश्न तातडीने निकाली लावणार असल्याचे म्हटले आहे.
Read also:
- संभाजी राजेंनी केलं मावळ्यांना ‘हे’ आव्हान; जनतेच्या मनातील बोधचिन्ह साकारणार
- “भाजपने हर्षवर्धन पाटलांना इडीसाठी ब्रँड अँबॅसिडर बनवावा”; काॅंग्रेसचा भाजपला खोचक टोला
- “नकली हिंदुत्वाची शाल पांघरलेल्या स्वयंघोषितांनी अयोध्येत दिसू नये हिच श्रीरामांची इच्छा”; दिपाली सय्यद
- “आदित्य ठाकरे अयोध्येला पाप धुण्यासाठी गेले”; रवी राणांचं शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल
- “पंकजाताई माझी मोठी बहिण, कोणीही मुर्खपणा करू नये”; निलेश राणेंनी भाजपच्याच नेत्याला खडसावलं