मुंबई : उत्तर प्रदेशात महाराष्ट्र सदन होण्यासाठी आमचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहेत. महाराष्ट्रातील खुप लोक अयोध्येत येत असतात. त्यामुळे अयोध्येत 100 ते 200 खोल्यांचं महाराष्ट्र सदन होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज अयोध्येत सांगितले. यावर आता मनसे नेते गजानन काळे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
नवी मुंबईत महाराष्ट्र भवनासाठी जागा आरक्षित असूनही तिथे साधी विट रचता आला नाही. पक्षप्रमुख मागच्यावेळी अयोध्येत येऊन महाराष्ट्र भवन बांधणार म्हणून घोषणा करतात. पुढे काहीच नाही. आता छोटे नवाब महाराष्ट्र भवनासाठी जागा मागणार. मग 2 वर्ष काय फक्त टोमण्यांमध्ये गेले का ? बोलघेवडे सरकार असं म्हणत त्यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला.
“आदित्य ठाकरे अयोध्येला पाप धुण्यासाठी गेले”; रवी राणांचं शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल
उत्तर प्रदेशमधील जनतेची इतरांबाबत कशी भूमिका आहे याबाबत मी काही बोलणार नाही. त्यांनी आमचं स्वागत केलं. कोरोनाच्या काळात महाराष्ट्राने सर्वांना समान वागणुक आणि प्राधान्य दिलं. इथे कोण कोणाचं स्वागत करतंय कोण विरोध करतंय यापेक्षा मंदिर निर्माण चांगलं व्हाव आणि त्यासाठी महाराष्ट्र सदन व्हानं अशी आमची इच्छा आहे. असंही ते म्हणाले.
“पंकजाताई माझी मोठी बहिण, कोणीही मुर्खपणा करू नये”; निलेश राणेंनी भाजपच्याच नेत्याला खडसावलं
दरम्यान, राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यासाठी शिवसेनेकडून अयोध्यामध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे. या दौऱ्यानिमित्ताने आदित्य ठाकरे रामलल्लाची आरती. पत्रकार परिषद, आणि इस्कॉन मंदिराला भेट देणार असा भरगच्च कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यासाठी नाशिक, पुणे आणि मुंबईतून हजारो शिवसैनिक अयोध्यामध्ये दाखल झाले आहेत.
Read also:
- “केवळ आडनावावरून ओबीसींची खरी संख्या समजणार नाही”; छगन भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
- “अयोध्येत महाराष्ट्र सदन होण्यासाठी योगींशी चर्चा करणार”; आदित्य ठाकरेंनी घेतलं रामलल्लाचं दर्शन
- “ठाकरे सरकारच पाण्याचे शत्रू , यांनी सिंचन योजनांचा खून केला”; फडणवीसांचा जालन्यात एल्गार
- संभाजी राजेंनी केलं मावळ्यांना ‘हे’ आव्हान; जनतेच्या मनातील बोधचिन्ह साकारणार
- “भाजपने हर्षवर्धन पाटलांना इडीसाठी ब्रँड अँबॅसिडर बनवावा”; काॅंग्रेसचा भाजपला खोचक टोला