मुंबई : राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत होण्यासाठी इम्पिरिकल डाटा जमा करण्याचे काम सुरू आहे. मात्र काही ठिकाणी आडणावरून जात गृहीत धरली जात असल्याची गोष्ट समोर येत आहेत. अशी पद्धत चुकीचे असून यात सर्वपक्षीयांनी लक्ष घालण्याची गरज आहे. असं छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाबाबात मत व्यक्त केले. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र देखील पाठवलं आहे.
“आदित्य ठाकरे अयोध्येला पाप धुण्यासाठी गेले”; रवी राणांचं शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल
केवळ आडनावावरून ओबीसींची खरी संख्या समजणार नाही, आडनावावरून जात ओळखणे चुकीचे असून ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. राज्यातील ओबीसी संघटनांनी सत्य परिस्थिती समर्पित आयोगाच्या निदर्शनास आणून द्यावी. केवळ आडनावावरून ओबीसींची खरी संख्या समजणार नाही, असंही छगन भुजबळ म्हणाले.
“पंकजाताई माझी मोठी बहिण, कोणीही मुर्खपणा करू नये”; निलेश राणेंनी भाजपच्याच नेत्याला खडसावलं
राज्यात पवार, जाधव, गायकवाड, शेलार, होळकर अशी अनेक आडनावे आहेत. ही आडनावे वेगवेगळ्या जातीत आढळतात. समर्पित आयोगाची भूमिका ही ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडून निवडणूक आयोगाच्या यादीतील प्रत्येक जातीतील लोकांची माहिती आयोगापर्यंत पोहचवावी. मात्र यात काही चूका होत आहेत. एकच आडनाव एकाच जातीत असल्याचे गृहीत धरून माहिती पाठवली जात आहे. त्यामुळे अश्या सदोष माहितीमुळे ओबीसींचा खरा टक्का समोर येणार नाही. सदोष महितीचा इम्परिकल डेटामुळे ओबीसींवर अन्याय होईल, मात्र आम्ही हा अन्याय होऊ देणार नाही. ही गोष्ट आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देऊन यात योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन राज्य मागासवर्गीय आयोगाला करणार आहोत. राज्याचे विरोधीक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज असाच प्रश्न उपस्थित केला आहे. असंही छगन भुजबळ म्हणाले.
“फडणवीससाहेबांचा मुख्यमंत्री होण्याचा आजार फार गंभीर झालाय, त्यांना उपचाराची गरज”; रूपाली पाटील
दरम्यान, मात्र विरोधीपक्षाने असे प्रश्न उपस्थित करण्याच्या ऐवजी बांठीया आयोगाला भेटून निवेदन दिले पाहिजे आणि राज्यातील सर्व ओबीसी संघटनांनी पुढे येऊन यात सत्य परिस्थिती बांठीया आयोगा समोर मांडल्या पाहिजे. स्थानिक पातळीवरून आयोगापर्यंत येत असलेल्या माहितीच्या प्रक्रियेत लक्ष घालून योग्य माहिती आयोगापर्यंत कशी पोहचेल याची खबरदारी सगळ्यांनी घ्यावी. राज्यात इंपिरीकल डाटा जमा करण्याचे काम हे स्थानिक पातळीवर सुरू आहे. राज्याचे स्थानिक पातळीवरील महसूल यंत्रणेचा वापर करून इम्पिरिकल डाटा जमा केला जाऊ शकतो. त्यामुळे तसे आदेश अधिकाऱ्यांना देणे गरजेचे आहे. गावातील तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील यांना त्या गावाची इत्यंभूत माहिती असते त्यामुळे त्यांची मदत घेऊन हे काम करणे आवश्यक आहे. असंही छगन भुजबळ म्हणाले.
Read also:
- “अयोध्येत महाराष्ट्र सदन होण्यासाठी योगींशी चर्चा करणार”; आदित्य ठाकरेंनी घेतलं रामलल्लाचं दर्शन
- “ठाकरे सरकारच पाण्याचे शत्रू , यांनी सिंचन योजनांचा खून केला”; फडणवीसांचा जालन्यात एल्गार
- संभाजी राजेंनी केलं मावळ्यांना ‘हे’ आव्हान; जनतेच्या मनातील बोधचिन्ह साकारणार
- “भाजपने हर्षवर्धन पाटलांना इडीसाठी ब्रँड अँबॅसिडर बनवावा”; काॅंग्रेसचा भाजपला खोचक टोला
- “नकली हिंदुत्वाची शाल पांघरलेल्या स्वयंघोषितांनी अयोध्येत दिसू नये हिच श्रीरामांची इच्छा”; दिपाली सय्यद