पुणे : विशेष प्रतिनिधी श्रीक्षेत्र देहू येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण कार्यक्रमाला मानपानाच्या राजकारणामुळे गालबोट लागले. भाजपा आणि राष्ट्रवादीच्या रस्सीखेचमध्ये संस्थानची नाहक बदनामी होत आहे. ही बाब वारकरी सांप्रदाय आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही. याचे तारतम्य राजकीय पक्ष आणि नेत्यांनी पाळले पाहिजे, अशी अपेक्षा वारकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
“केवळ आडनावावरून ओबीसींची खरी संख्या समजणार नाही”; छगन भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहीले. देशाचे पंतप्रधान श्रीक्षेत्र देहूला भेट देण्याची इतिहासातील पहिलची घटना आहे. यासह संत ज्ञानोबा आणि संत तुकोबा यांच्या पालखी मार्गासाठी मोदींनी तब्बल ११ हजार कोटी रुपये खर्च करण्याची घोषणा केली. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू दिले नाही, या कारणावरुन राष्ट्रवादी आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये वाक्युद्ध रंगले आहे.
“अयोध्येत महाराष्ट्र सदन होण्यासाठी योगींशी चर्चा करणार”; आदित्य ठाकरेंनी घेतलं रामलल्लाचं दर्शन
मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी संस्थानने स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रण दिले नाही, असे सांगत टीका केली. संस्थानने केलेल्या खर्चाचा हिशोब दिला पाहिजे. संस्थानचा कार्यक्रम भाजपाने हायजॅक केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्यावर घणाघात केला. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी थेट संस्थान राज्य सरकारने ताब्यात घ्यावे, अशी मागणी केली. भूमिपुत्रांचा अपमान असाही मुद्दा समोर आला. या सर्व वादाला तोंड फुटले ते राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या अमरावतीतील पत्रकार परिषदेमुळे. याच पत्रकार परिषदेत खासदार सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करु न देणे हा महाराष्ट्राचा अवमान आहे..’’ अशी टीका केली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही भाजपाला अजित पवारांच्या भितीचा टोमणा मारला.
“ठाकरे सरकारच पाण्याचे शत्रू , यांनी सिंचन योजनांचा खून केला”; फडणवीसांचा जालन्यात एल्गार
या सर्व घडामोडीत श्रीक्षेत्र देहू संस्थान आणि त्याचे विश्वस्त अत्यंत एकाकी पडले आहेत. देशाचे पंतप्रधान येत असल्याने आनंदीत झालेले देहकर राजकीय वादामुळे नाराज झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचे आणि वारकरी सांप्रदायाचे लक्ष लागून राहीलेल्या या कार्यक्रमाला केवळ राजकीय असुयेतून गालबोट लागले, अशी खंत व्यक्त होत आहे.
संभाजी राजेंनी केलं मावळ्यांना ‘हे’ आव्हान; जनतेच्या मनातील बोधचिन्ह साकारणार
रोखठोक अजित पवारांचे मौन का ?…
वास्तविक, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीक्षेत्र देहूतील कार्यक्रम आणि त्या ठिकाणी भाषण करण्याची संधी न दिल्याबाबत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पंतप्रधान मोदी यांच्या संपूर्ण दौऱ्यात आणि कार्यक्रमातही पवार उपस्थित होते. विशेष म्हणजे, मोदींना निरोप देण्यासाठी अजित पवार उपस्थित राहीले. सडेतोड आणि रोखठोक मत मांडणारा नेता असा अजित पवार यांची ओळख आहे. मात्र, पवार या मुद्यावर काहीही बोलले नाहीत. याउलट, कार्यक्रम संपल्यानंतर मोदी- फडणवीस आणि पवार यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाली, असे सांगण्यात आले. त्यामुळे अजित पवार यांचे मौन का? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Read also:
- “ओबीसी, मराठा आरक्षणाचं वाट्टोळ करणाऱ्या प्रस्थापितांची हीच खरी वृत्ती”; पडळकारांचा सुप्रिया सुळेंवर टिकास्त्र
- “आपल्याला देव पावला, नाहीतर आपल्या देखील 60 टक्के जागा कमी झाल्या असत्या”; सुप्रिया सुळे
- “इंग्रज सरकारपेक्षाही वाईट सरकार केंद्रात, आम्ही यांना घाबरत नाही”; नाना पटोले
- राष्ट्रपती निवडणुक ! शरद पवारांनी नकार दिल्यानंतर ममता बॅंनर्जींनी सुचवली ही नावं
- “आता छोटे नवाब महाराष्ट्र भवनासाठी जागा मागणार, मग 2 वर्ष काय फक्त टोमण्यांमध्ये गेले का ?