जालना : विधान परिषदेच्या निवडणुकीत आमचा एकनाथ खडसे यांनाच पराभूत करण्याचा डाव नसून, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसचा देखील पराभव करू. व्यक्तीच्या नावाला नाही तर पक्षाला हरवणार आहोत. असं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत देखील वक्तव्य केले आहे.
विधान परिषेदच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांना उमेदवारी देऊ नका, असं भाजपने म्हटलं नाहीतर त्यांचा तो निर्णय त्यांच्या पक्षाचा आहे. असंही ते म्हणाले. पंकजा मुंडे यांना भाजप वाईट वागणूक देत असल्याने त्या नवीन पक्ष काढणार आहेत. असं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले. त्यावर बोलताना दानवे म्हणाले की, इम्तियाज जलील यांनी सांगितल्यानंतर पंकजा मुंडे लगेचच पक्ष काढणार नाहीत. त्या ज्येष्ठ नेत्या असून गोपीनाथ मुंडे हे भाजप पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत. त्यामुळे त्या असं निर्णय घेणार नाहीत.
“आपल्याला देव पावला, नाहीतर आपल्या देखील 60 टक्के जागा कमी झाल्या असत्या”; सुप्रिया सुळे
विधान परिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्या असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यावर बोलताना ते म्हणाले की, पंकजा मुंडे या पक्षाच्या राष्ट्रीय सचीव आहेत. त्यावर पक्ष योग्य तो निर्णय घेईल, याची मला खात्री आहे. असंही रावसाहेब दानवे म्हणाले.
“इंग्रज सरकारपेक्षाही वाईट सरकार केंद्रात, आम्ही यांना घाबरत नाही”; नाना पटोले
दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना डावलून भाजपने उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत भाजपचे 5 उमेदवार मैदानात असून 4 विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपचे 4 उमेदवार सहज निवडून येतात, तर पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.
Read also:
- “दोन लुटारू भाई भाई अवघा देश लुटून खाऊ”; शरद पवार, अदानी एकाच मंचावर, सदाभाऊंचा टोला
- “मुंबई महापालिका निवडणुकीत ‘मराठी मुलगी’ म्हणून प्रचार करणार”; नवनीत राणांनी पुन्हा थंड थोपटले
- “मोदींपेक्षा कोणी मोठं नाही, त्यांनीच अजित दादांनी पहिले बोलावं असं म्हटलं होतं”
- “मी आमदार नाही, मंत्री आहे, हा प्रश्न त्यांना विचारा”; बच्चू कडूंचं ‘त्या’ प्रश्नांवर तिखट उत्तर
- राजकीय मानपानाच्या नाट्यात देहू संस्थानची प्रतिमा मलीन; अजित पवार यांच्याकडून अद्यापही मौन