पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल देहु येथे संत तुकाराम महाजांच्या शिळा मंदिरांचं उद्घाटन करण्यात आले. मात्र इतक्या मोठ्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांना भाषण न करू दिल्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसने आक्रमक भुमिका घेतली. त्यावेळी मोदींसह देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. आता यावर त्यावेळी नेमकं काय घडलं होतं. ते चंद्रकांत पाटलांनी सांगितले.
राष्ट्रपती निवडणुक ! शरद पवारांनी नकार दिल्यानंतर ममता बॅंनर्जींनी सुचवली ही नावं
भाषण करण्यासंदर्भात अजित पवार एकदा तरी बोलले असते. तर मी स्वत: त्याठिकाणी होतो. ज्यावेळी संयोजकांनी मोदींना बोलण्यासाठी बोलवलं. तेव्हा मोदी हे जागेवरून उठलेच नाही. ते अजित पवारांना म्हणाले की, तुम्ही बोलायला हवं. तेव्हा अजित पवार म्हणाले की मी आधीच सांगितलं की बोलणार नाही. मी अगदी त्यांच्या शेजारीच होतो. मोदींची इच्छा होती की अजित पवारांनी बोलावं पण त्यांनी सांगितलं की कार्यक्रम पत्रिका ठरतानाच मी सांगितलेलं की मी बोलणार नाही. मोदींपेक्षा कोणी मोठं नाही. त्यांनी स्वत: अजित दादांनी पहिले बोलावं असं म्हटलं होतं. असंही चंद्रकांत पाटलांनी सांगितले.
“आता छोटे नवाब महाराष्ट्र भवनासाठी जागा मागणार, मग 2 वर्ष काय फक्त टोमण्यांमध्ये गेले का ?
अजित पवारांना देहुत बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे अंस म्हणत सुप्रिया सुळे यांनी काल भाजपवर टिका केली होती. त्याचबरोबर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून पुण्यात याचा जाहीर निषेध देखील व्यक्त करण्यात आला. यावर भाजपकडून देखील प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. तर देहुतील कार्यक्रम हा सरकारी नसता तर खाजगी होता. असं देखील भाजपकडून सांगण्यात येत आहे.
“अयोध्येत महाराष्ट्र सदन होण्यासाठी योगींशी चर्चा करणार”; आदित्य ठाकरेंनी घेतलं रामलल्लाचं दर्शन
प्रत्येक विषयाला राजकारणाची किनार जोडू नये. हा अतिशय सामान्य प्रसंग आहे. यात अपमानाचा काहीच विषय नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अजित दादांना बोलले. त्यामध्ये सगळंच आलं. अजित दादांना बोलायला न मिळणे यात महाराष्ट्राचा अपमान कसा झाला. देहुच्या संस्शानचे अध्यक्ष बोलले, पंढरपुरचे अध्यक्ष आणि आळंदीच्या अध्यक्षांनी सन्मान केला. आचार्च भोसलेंनी आभार मानले. यात महाराष्ट्राचा अपमानाचा विषय कुठे येतो. जर देहुच्या संस्थानाला बोलायला मिळालं नसतं तर असं बोलता आलं असतं हा अनावश्यक वाद निर्माण केला आहे. असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
Read also:
- “मी आमदार नाही, मंत्री आहे, हा प्रश्न त्यांना विचारा”; बच्चू कडूंचं ‘त्या’ प्रश्नांवर तिखट उत्तर
- राजकीय मानपानाच्या नाट्यात देहू संस्थानची प्रतिमा मलीन; अजित पवार यांच्याकडून अद्यापही मौन
- “ओबीसी, मराठा आरक्षणाचं वाट्टोळ करणाऱ्या प्रस्थापितांची हीच खरी वृत्ती”; पडळकारांचा सुप्रिया सुळेंवर टिकास्त्र
- “आपल्याला देव पावला, नाहीतर आपल्या देखील 60 टक्के जागा कमी झाल्या असत्या”; सुप्रिया सुळे
- “इंग्रज सरकारपेक्षाही वाईट सरकार केंद्रात, आम्ही यांना घाबरत नाही”; नाना पटोले