पुणे : राजीव गांधी सायन्स टेक्सनॉलॉजी कमिशन, महाराष्ट्र सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बारामतीत उभारण्यात आलेल्या सायन्स अॅन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटरचे गुरूवारी उद्धघाटन करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी याचं स्वागत आणि त्यांच्या गाडीचं स्वारस्थ राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवारांनी केलं.
राजकीय मानपानाच्या नाट्यात देहू संस्थानची प्रतिमा मलीन; अजित पवार यांच्याकडून अद्यापही मौन
जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचे असेल तर वैज्ञानिक भूमिका स्वीकारावी लागेल. त्यासाठी भाकड समजुती, खोटेपणा या गोष्टींनी व्यक्तीचे मन तयार होत नाही आणि विज्ञानावर आधारीत ज्ञान घेऊन मानसिकता तयार करण्याची काळजी आपण घेतली पाहिजे. तरच जीवनात यश मिळणार. बारामती येथे उभारण्यात आलेल्या या केंद्राला तुम्ही भेट द्याल तेव्हा विज्ञानाचे किती चमत्कार केले आहेत हे तुम्हाला पाहायला मिळेल, असं मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
चंद्र काय, मंगळ काय इथेेपर्यंतचा प्रवास माणूस सहज करतोय हा एक प्रचंड बदल आहे. हा बदल केवळ विज्ञानामुळे होऊ शकला. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टी तयार होणे, विज्ञानाच्या आधारे विचार करण्याची भूमिका मनामध्ये तयार होणे आणि जीवनाच्या विविध क्षेत्रात विज्ञानाला सोबत घेऊन पुढे यश मिळवायची भूमिका ठरवणे, हे सगळे करण्याची आवश्यकता आहे. त्याचा पाया म्हणजे तुमची मानसिकता विज्ञानासंबंधी विकसित झाली पाहिजे. असंही ते म्हणाले.
“आपल्याला देव पावला, नाहीतर आपल्या देखील 60 टक्के जागा कमी झाल्या असत्या”; सुप्रिया सुळे
दरम्यान, यावेळी उद्योगपती गौतम अदानी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार आदि उपस्थित होते. गौतम अदानी आणि शरद पवार यावेळी एकाच मंचावर उपस्थित होते. यानंतर राज्यात एकच चर्चा सुरू झाली आहे. त्यावरून लुटारू आले की घोड्यावरून यायचे. आता गाड्यांमधून येतात. दोन लुटारू भाई भाई अवघा देश लुटून खाई, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. आता यावर राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- “जलील यांनी सांगितल्यानंतर पंकजा मुंडे लगेचच पक्ष काढणार नाहीत, त्यांचा पक्ष विचार करेल” रावसाहेब दानवे
- “दोन लुटारू भाई भाई अवघा देश लुटून खाऊ”; शरद पवार, अदानी एकाच मंचावर, सदाभाऊंचा टोला
- “मुंबई महापालिका निवडणुकीत ‘मराठी मुलगी’ म्हणून प्रचार करणार”; नवनीत राणांनी पुन्हा थंड थोपटले
- “मोदींपेक्षा कोणी मोठं नाही, त्यांनीच अजित दादांनी पहिले बोलावं असं म्हटलं होतं”
- “मी आमदार नाही, मंत्री आहे, हा प्रश्न त्यांना विचारा”; बच्चू कडूंचं ‘त्या’ प्रश्नांवर तिखट उत्तर