मुंबई : राज्यसभेची निवडणूक पार पाडल्यानंतर आता १८ जूलै रोजी राष्ट्पती पदासाठी मतदान होणार आहे. अलिकडेच यासंदर्भात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांंनी राष्ट्रपतीपदासाठी प्रस्ताव ठेवला होता. मात्र राष्ट्रपती निवडणुक लढवणार नसल्याचं शरद पवारांनी अगोदरच स्पष्ट केले आहे. यावर आता शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“दोन लुटारू भाई भाई अवघा देश लुटून खाऊ”; शरद पवार, अदानी एकाच मंचावर, सदाभाऊंचा टोला
राष्ट्रपती पदासाठी पवार साहेबांनी नकार दिला असला तरी कित्येक दलांचे पक्षप्रमुख आजही त्यांच्या संपर्कात आहेत. पवारसाहेबांमुळे पंतप्रधान पदावर 2024 मध्ये मराठी नेतृत्वच बसणार आहे. मग तो पक्ष भाजप असो वा महाविकास आघाडी, असं दिपाली सय्यद यांनी ट्विट केलं आहे. शरद पवारांनी नकार दिल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांचं नाव सुचवलं. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष कोणला उमेदवारी देणार ते आता पहावं लागणार आहे. तसेच या निवडणुकीत एनडीचा उमेदवार शर्यतीत सर्वात पुढे आहे. त्यामुळे भाजप कुणाला संधी देणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
“मुंबई महापालिका निवडणुकीत ‘मराठी मुलगी’ म्हणून प्रचार करणार”; नवनीत राणांनी पुन्हा दंड थोपटले
राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारिख २९ जून आहे. त्यासंदर्भातच आज ममता बॅनर्जी, शरद पवार, माजी पंतप्रधान देवगौडा, मल्लिकार्जून खरगे, अखिलेश यादव, मेहबुबा मुक्ती, सुभाष देसाई, इ करीम, जयराम रमेश, प्रफुल्ल पटेल, टी. आर.बालू, यशवंत सिंन्हा, रणदीप सुरजेवाला, प्रियंका चतुर्वेदी, उमर अब्दुला, राजा आदि नेते बैठकीत उपस्थित होते. मात्र शरद पवारांनी साफ नकार दिला.
“मोदींपेक्षा कोणी मोठं नाही, त्यांनीच अजित दादांनी पहिले बोलावं असं म्हटलं होतं”
दरम्यान, आयोगाने मतदानाच्या दिवशी प्रोटोकॉल पाळण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आमदारांच्या एकूण मतांचे मुल्य ५,४३,२३१ आहे. तर खासदारांच्या एकूण मतांचे मुल्य ५,४३,२०० आहे. दोन्ही मतदारांच्या मतांचे एकुण मूल्य १०,८६,४३१ इतकं असून एका खासदारांच्या मताचे मुल्य ७०० आहे.
राष्ट्रपती पदासाठी पवार साहेबांनी नकार दिला असला तरी कित्येक दलांचे पक्षप्रमुख आजही त्यांच्या संपर्कात आहेत. पवारसाहेबांमुळे पंतप्रधान पदावर २०२४ मध्ये मराठी नेतृत्वच बसणार मग पक्ष भाजप असो या मविआ.जय महाराष्ट्र @BJP4Maharashtra @MumbaiNCP
— Deepali Sayed (@deepalisayed) June 16, 2022
Read also:
- केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेला रोहित पवारांचा विरोध; अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना
- “आता भाजपला कोणत्याही निवडणुकीत जिंकणं अशक्य”; नाना पटोलेंचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल
- अन् चक्क रोहित पवारांनी गौतम अदानीच्या गाडीचं सारथ्य केलं; राजकीय वर्तुळात एकच चर्चा
- “बारामती केंद्राला भेट द्याल तेव्हा विज्ञानाचे अनेक चमत्कार बघायला मिळतील”; शरद पवार
- “जलील यांनी सांगितल्यानंतर पंकजा मुंडे लगेचच पक्ष काढणार नाहीत, त्यांचा पक्ष विचार करेल” रावसाहेब दानवे