पुणे : केंद्र सरकारने लष्कर, नौदल आणि वायुदलातील सैनिक भरतीसाठी अग्निपथ नावाची योजना आणली आहे. या योजनेंतर्गत तरूणांना संरक्षण दलामध्ये चार वर्षे अग्निवीर म्हणून सेवा करण्याची संधी मिळणार आहे. मात्र या भरतीला देशभरातून जोरदार विरोध केला जात आहे. अनेक ठिकाणी आज तरूणांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलने केलीत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
“मुंबई महापालिका निवडणुकीत ‘मराठी मुलगी’ म्हणून प्रचार करणार”; नवनीत राणांनी पुन्हा दंड थोपटले
बेरोजगारीवरून सरकारवर होणाऱ्या टिकेला वेगळं वळण देण्यासाठी आणि 2024 च्या निवडणुकीच्या तयारीसाठी ही योजना आणली जात असेल तर मग हे राष्ट्रीय दुर्दैव आहे. केंद्राने या संदर्भात गांभीर्याने विचार करायला हवा. चार वर्ष सेवेच्या काळात शिक्षणाच्या मूळ प्रवाहारापासून लांब राहिलेल्या युवकांना चार वर्षानंतर काय संधी असतील, याबद्दल कुठलीही स्पष्टता या योजनेत नाही. असंही रोहित पवार म्हणाले.
“मोदींपेक्षा कोणी मोठं नाही, त्यांनीच अजित दादांनी पहिले बोलावं असं म्हटलं होतं”
युवकांना रोजगार मिळेल, असं केंद्र सरकार सांगत असलं तरी या योजनेतील रोजगार म्हणजे केवळ आजचं मरण उद्यावर ढकलण्यासारखं आहे. कुठलीही चाचपणी न करता आणलेल्या नोटबंदी, जीएसटी यांचे परिणाम आजही देशाला भोगावे लागत आहेत. त्यामुळे किमान संरक्षणासारख्या महत्वपूर्व क्षेत्रात संरचात्मक बदल करणारी एखादी योजना आणली जात असेल तर तत्पूर्वी ती प्रायोगिक तत्वार राबवणं गरजेचं आहे. असंही रोहित पवार म्हणाले.
“मी आमदार नाही, मंत्री आहे, हा प्रश्न त्यांना विचारा”; बच्चू कडूंचं ‘त्या’ प्रश्नांवर तिखट उत्तर
दरम्यान, केंद्र सरकारने आणणलेल्या या योजनेमुळे बिहार, उत्तरप्रदेश येथील तरूणांनी आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. अनेक ठिकाणी रस्ता रोको, रेल रोको करत सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. तर काही ठिकाणी झाळपोळीच्याही घटना घडल्या आहेत. या योजनेवर आता देशातील राजकीय नेत्यांनी देखील संताप व्यक्त करीत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Read also:
- “आता भाजपला कोणत्याही निवडणुकीत जिंकणं अशक्य”; नाना पटोलेंचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल
- अन् चक्क रोहित पवारांनी गौतम अदानीच्या गाडीचं सारथ्य केलं; राजकीय वर्तुळात एकच चर्चा
- “बारामती केंद्राला भेट द्याल तेव्हा विज्ञानाचे अनेक चमत्कार बघायला मिळतील”; शरद पवार
- “जलील यांनी सांगितल्यानंतर पंकजा मुंडे लगेचच पक्ष काढणार नाहीत, त्यांचा पक्ष विचार करेल” रावसाहेब दानवे
- “दोन लुटारू भाई भाई अवघा देश लुटून खाऊ”; शरद पवार, अदानी एकाच मंचावर, सदाभाऊंचा टोला