मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने पाच उमेदवार उभे केले असून विधिमंडळाच्या संख्याबळानुसार त्यांना 20 मताची गरज आहे. त्यामुळे ही 20 मतं भाजप दबाव, चोऱ्यामाऱ्या, आणि दहशत दाखवून आणणार आहेत. असं खळबळजनक वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलं आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 11 उमेदवार रिंगणात असून त्यासाठी उद्या मतदान होणार आहे.
“शरद पवारांचं फक्त नाव वाजवण्यासाठी चर्चा”; गुणरत्ने सदावर्तेंनी साधला पवारांवर निशाणा
विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे 5 उमेदवार आणि महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन दोन उमेदवार उभे आहेत. या निवडणुकीत भाजप आणि काॅंग्रेसला अतिरिक्त मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यावरूनच संजय राऊतांनी भाजपला टोला लगावला आहे. लोकशाही पद्धतीमध्ये आता मतं मिळवण्यासाठी भाजप दबाव आणि दहशती निर्माण करण्याचे प्रयत्न करीत असल्याचंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व आमदारांशी योग्य समन्वय साधला आहे. त्यामुळे भाजपने कितीही अफवा पसरवल्या तरी महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येईल, त्याचबरोबर राज्यसभेच्या निवडणुकीचा बदला देखील महाविकास आघाडी घेईल, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
विखे पाटलांनी दिलेल्या ऑफरवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “आमचं मस्त चाललंय”
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते नवाब मलिक आणि देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. राष्ट्रवादीच्या वकिलांनी उच्च न्यायालयात देखील यासंदर्भात याचिका दाखल केली होती. मात्र ती फेटाळण्यात आली. त्याचबरोबर आता विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील महाविकास आघाडीला धक्का बसला असून मलिक आणि देशमुख यांची दोन मत याही निवडणुकीतून जाणार आहेत.
Read also:
- “आघाडीतील काही आमदारांशी भाजपकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न”; थोरातांचा खळबळजनक दावा
- आपणास ‘बारा’ हत्तीचं बळ मिळो, रोहित पवारांच्या भगतसिंग कोश्यारींना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा
- “महंमद तुघलकी सारखी अग्निपथ योजना केंद्र सरकारने मागे घ्यावी”; सचिन खरात
- “घोडा बाजार जवळच आहे, त्याचा निकाल लवकरच लागणार”; बच्चू कडू
- “शरद पवार राष्ट्रपती पदासाठी उभे राहिले असते तर पारडे त्यांच्याकडे झुकले असते”