मुंबई : विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 20 जून रोजी मतदान होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील आमदारांना रेनेसॉ हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे तर भाजपचे आमदार ताज हॉटेलमध्ये आहेत. मतदान होईपर्यंत कोणत्याही आमदारांना इतरत्र संपर्क साधला जाऊ शकणार नाही, याची काळजी दोन्ही बाजूंनी घेतली जात आहे. मात्र काॅंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी खळबळ जनक वक्तव्य केले आहे.
भाजपचे काही नेते महाविकास आघाडीतील नेत्यांशी संपर्क साधत असल्याचे बाळासाहेब थोरातांनी म्हटले आहे. 20 जूनला होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील, अशी तयारी पूर्ण झाली आहे. त्याच दिवशी महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक होणार आहे. समन्वय साधून निवडूक लढवली जाते. त्यामुळे रविवारी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. यात पुन्हा काही रणनीती तयार केली जाईल. यावेळी काही अडथळा येणार नाही. असंही ते म्हणाले.
विखे पाटलांनी दिलेल्या ऑफरवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “आमचं मस्त चाललंय”
ज्या पद्धतीने भाजपचे काही नेते महाविकास आघाडीतील काही आमदारांशी संपर्क साधत आहेत. त्याच पद्धतीने आमचेही काही नेते भाजपच्या आमदारांशी संपर्क साधत आहेत. मात्र त्याचा तपशील अद्यापही आलेला नाही. त्याचबरोबर त्याचा निकाल उद्या लागणार आहे. असंही ते म्हणाले.
माझ्या सोबत राऊतांना मतदान करायला पाठवा, नाही तर बोलतील की,..; देवेंद्र भुयारांचा राऊतांना टोला
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेची निवडणुक देखील रंगतदार होणार आहे. कारण 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात उभे राहिले असून महाविकास आघाडी राज्यसभेच्या निवडणुकीचा बदला घेणार का ? की याही निवडणुकीत भाजपचा सहावा उमेदवार निवडून येईल, ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- आपणास ‘बारा’ हत्तीचं बळ मिळो, रोहित पवारांच्या भगतसिंग कोश्यारींना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा
- “महंमद तुघलकी सारखी अग्निपथ योजना केंद्र सरकारने मागे घ्यावी”; सचिन खरात
- “घोडा बाजार जवळच आहे, त्याचा निकाल लवकरच लागणार”; बच्चू कडू
- “शरद पवार राष्ट्रपती पदासाठी उभे राहिले असते तर पारडे त्यांच्याकडे झुकले असते”
- “शरद पवारांचं फक्त नाव वाजवण्यासाठी चर्चा”; गुणरत्ने सदावर्तेंनी साधला पवारांवर निशाणा