मुंबई : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते संजय पवार यांचा पराभव भाजपचे नेते धनंजय महाडिक यांनी केला. संजय पवारांना अवघी ३९ मतं त्या निवडणुकीत पडले तर महाविकास आघाडीतील जवळपास ७ मत फुटली. यानंतर या पराभवाचा खापर शिवसेनेने अपक्ष आमदारांवर फोडला आहे. अशातच आता विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
“शरद पवार राष्ट्रपती पदासाठी उभे राहिले असते तर पारडे त्यांच्याकडे झुकले असते”
विधीमंडळाच्या संख्याबळानुसार शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहेच, त्याचबरोबर शिवसेनेकडे सध्या दोन अतिरिक्त मतं शिल्लक असून ती मत काॅंग्रेसला मिळावीत यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दवाब टाकला जात आहे. अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस आम्हाला मदत करीत नाही, मग शिवसेनेची मत त्यांना का द्यावी, असा सवाल शिवसेनेच्या आमदारांकडून केला जात आहे.
“शरद पवारांचं फक्त नाव वाजवण्यासाठी चर्चा”; गुणरत्ने सदावर्तेंनी साधला पवारांवर निशाणा
शिवसेनेच्या आमदारांनी घेतलेल्या या भुमिकेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. संजय पवार आणि गोपीकिशन बाजोरियांच्या पराभवामुळे शिवसेना आमदार राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसवर नाराज आहेत. त्यामुळेच आमचं मत फक्त शिवसेनेला देणार असल्याची भूमिका शिवसेनेच्या आमदारांनी घेतली आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे काॅंग्रेसच्या दुसऱ्या आमदाराचं भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडी एकत्रित म्हणून निवडणुक लढवित असून शिवसेनेच्या आमदारांमुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर देखील मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे काॅंग्रेसच्या नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांवर दवाब देखील आणला जात असल्याची चर्चा रंगली आहे.
Read also:
- “निवडणुकीमध्ये भाजप मतांसाठी दबाव, अन् दहशत निर्माण करतील”; संजय राऊत
- “आघाडीतील काही आमदारांशी भाजपकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न”; थोरातांचा खळबळजनक दावा
- आपणास ‘बारा’ हत्तीचं बळ मिळो, रोहित पवारांच्या भगतसिंग कोश्यारींना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा
- “महंमद तुघलकी सारखी अग्निपथ योजना केंद्र सरकारने मागे घ्यावी”; सचिन खरात
- “घोडा बाजार जवळच आहे, त्याचा निकाल लवकरच लागणार”; बच्चू कडू