मुंबई : विधान परिषदेच्या 10 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. मात्र राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते शरद पवार हे आज दिल्लीकडे रवाना झाले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये व्यस्त असताना शरद पवार दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीवेळीही शरद पवार दिल्लीत होते.
“महंमद तुघलकी सारखी अग्निपथ योजना केंद्र सरकारने मागे घ्यावी”; सचिन खरात
भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय आणि प्रसाद लाड हे नेते उभे आहेत. तर राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे आणि काॅंग्रेसकडून भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
“घोडा बाजार जवळच आहे, त्याचा निकाल लवकरच लागणार”; बच्चू कडू
विधिमंडळाच्या संख्याबळानुसार भाजपचे चार उमेदवार आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दोन तर काॅंग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. मात्र यामध्ये खरी लढत भाजप आणि काॅंग्रेसने दिलेल्या अतिरिक्त उमेदवारांमध्ये आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
“शरद पवार राष्ट्रपती पदासाठी उभे राहिले असते तर पारडे त्यांच्याकडे झुकले असते”
दरम्यान, शरद पवारांची भूमिका महाविकास आघाडीमध्ये महत्वाची राहिली आहे. त्यामुळे नेमकं मतदानाच्याच वेळी शरद पवार दिल्लीत दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसेच शिवसेनेच्या आमदारांनी घेतलेली भूमिकेमुळे काॅंग्रेसचा उमेदवार पराभवाच्या छायेत असून् काॅंग्रेसकडून मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकत असल्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत.
Read also:
- सेनेलाच मत देणार, शिवसेना आमदारांची भूमिका; तर मुख्यमंत्र्यावर काॅंग्रेसकडून दवाब
- “निवडणुकीमध्ये भाजप मतांसाठी दबाव, अन् दहशत निर्माण करतील”; संजय राऊत
- “आघाडीतील काही आमदारांशी भाजपकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न”; थोरातांचा खळबळजनक दावा
- आपणास ‘बारा’ हत्तीचं बळ मिळो, रोहित पवारांच्या भगतसिंग कोश्यारींना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा