पुणे : सैन्यभरतीसाठी केंद्र सरकारने अग्निपथ नावाची योजना जाहिर केली आहे. परंतु या योजनेमध्ये नियोजनाचा अभाव आहे. याशिवाय ती अतार्कीक देखील आहे. परिणामी या योजनेमुळे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर निरोशेचे वातावरण आहे. असं मत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. केंद्र सरकारने आणणलेल्या या योजनेला सध्या देशभरातून विरोध होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.
“उद्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान, तर शरद पवार दिल्लीकडे रवाना”; राजकीय घडामोडींना वेग
देशाची सुरक्षा, लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये जाण्याची इच्छा असणारे पात्र तरुण यांच्या भवितव्याशी खेळणारी ही अग्निपथ योजना तातडीने मागे घेण्याची गरज आहे. माझी केंद्र सरकारला विनंती आहे की, कृपया ही योजना मागे घेण्याबाबत सकारात्मक विचार करावा. देशभरात अनेक ठिकाणी हा रोष बाहेर पडला असून त्याची परिणती हिंसक घटनांमध्ये झाली आहे. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना देखील घडल्या आहेत. यातून मोठ्या प्रमाणात जिवित व वित्तहानी होत आहे. हे अतिशय दुर्दैवी आणि निराशाजनक आहे. असंही त्या म्हणाल्या.
सेनेलाच मत देणार, शिवसेना आमदारांची भूमिका; तर मुख्यमंत्र्यावर काॅंग्रेसकडून दवाब
भारतीय सैन्यदलात भरती होण्यासाठी सद्यस्थिती अतिशय सक्षम अशी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतून निवडलेल्या सैन्यदलाने अतिशय उत्तम सेवा दिली आहे. याच प्रक्रियेतून निवडलेल्या सैन्यदलाने भारतीय सीमांचे रक्षण प्राणपणाने तर केलेच याशिवाय अनेक अडचणींच्या काळात दर्जेदार सेवा देखील बजावली आहे. या पार्श्वभूमीवर ही नवी योजना आणून सरकारने गोंधळाचे वातावरण निर्माण केले असून आपल्या अदूरदृष्टीचे दर्शन घडविले आहे. अग्नीवीरसारख्या योजना राबवून भारतीय संरक्षण दल या अतिशय महत्वाच्या संस्थेशी छेडछाड करण्यात येत आहे. असा आरोप देखील त्यांनी केंद्र सरकारावर केला आहे.
“निवडणुकीमध्ये भाजप मतांसाठी दबाव, अन् दहशत निर्माण करतील”; संजय राऊत
दरम्यान, केंद्र सरकारने 18 ते 21 या वयोगटातील तरूणांसाठी आणलेल्या अग्निपथ या योजनेला देशभरातून जोरदार विरोध होत आहे. देशातील राजस्थान, बिहार आणि तेलंगाणा सारख्या राज्यांमध्ये काही हिंसक घटना देखील बघायला मिळाल्या. राजकीय नेत्यांशी देखील या योजनेवरून केंद्र सरकारवर जोरदार टिका केली आहे.
Read also:
- JNU मध्ये 12 वर्षे शिक्षण घेऊनही तुला कोणी मुलगी का दिली नाही? अग्निपथ योजनेवरून भाजपचा सवाल
- “विधान परिषदेच्या निवडणुकीतही देवेंद्र फडणवीसांची जादू चालणार”; रामदास आठवले
- राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेसाठीही जगताप, टिळक मुंबई दाखल होणार
- “पावसात भिजण्यापेक्षा विचाराने भिजू, उद्याची निवडणूक आपणच जिंकणार”; उद्धव ठाकरे
- “देवेंद्र पेक्षा हितेंद्र पावरफुल ठरणार, कोणी कितीही लोटांगण घाला”