मुंबई : ज्या पद्धतीची जादू देवेंद्र फडणवीस यांची राज्यसभेच्या निवडणुकीत चालली तीच जादू पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे. विधान परिषदेच्या सर्व जागा या भाजपच जिंकणार असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. तसेच पुन्हा एकदा महाविकास आघाडीला आम्ही धक्का देणार असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला आहे.
“निवडणुकीमध्ये भाजप मतांसाठी दबाव, अन् दहशत निर्माण करतील”; संजय राऊत
राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे भाजपचा तिसरा उमेदवार विजयी झाला. यावेळी देखील अपक्ष आमदारांची साथ ही भाजपला असून पाचही उमेदवार विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी होतील, अशी आशा देखील रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
“आघाडीतील काही आमदारांशी भाजपकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न”; थोरातांचा खळबळजनक दावा
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिक आणि भीमसैनिक यांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बाळासाहेबाचं जे स्वप्न आहे, त्यासाठी अजून वेळ गेलेली नाही. राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसची साथ सोडून त्यांनी आमच्यासोबत यावं आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बननण्याची संधी दिली पाहिजे. अडीच अडीच वर्ष असा फार्म्युला तयार गेला पाहिजे. असंही ते म्हणाले.
आपणास ‘बारा’ हत्तीचं बळ मिळो, रोहित पवारांच्या भगतसिंग कोश्यारींना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा
दरम्यान, येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत १५० ते १६० जागा जिंकून सत्ता स्थापन करायची आहे. तसेच लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये देखील आम्ही सर्वच्या सर्व जागा जिंकू असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
Read also:
- राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेसाठीही जगताप, टिळक मुंबई दाखल होणार
- “पावसात भिजण्यापेक्षा विचाराने भिजू, उद्याची निवडणूक आपणच जिंकणार”; उद्धव ठाकरे
- “देवेंद्र पेक्षा हितेंद्र पावरफुल ठरणार, कोणी कितीही लोटांगण घाला”
- “उद्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान, तर शरद पवार दिल्लीकडे रवाना”; राजकीय घडामोडींना वेग
- सेनेलाच मत देणार, शिवसेना आमदारांची भूमिका; तर मुख्यमंत्र्यावर काॅंग्रेसकडून दवाब