मुंबई : केंद्र सरकारने 18 ते 21 या वयोगटातील तरूणांसाठी आणलेल्या अग्निपथ या योजनेला देशभरातून जोरदार विरोध होत आहे. देशातील राजस्थान, बिहार आणि तेलंगाणा सारख्या राज्यांमध्ये काही हिंसक घटना देखील बघायला मिळाल्या. राजकीय नेत्यांशी देखील या योजनेवरून केंद्र सरकारवर जोरदार टिका केली आहे.
सेनेलाच मत देणार, शिवसेना आमदारांची भूमिका; तर मुख्यमंत्र्यावर काॅंग्रेसकडून दवाब
काॅंग्रेस नेता कन्हैया कुमार यांनी याबाबत एक सवाल केला आहे. अग्निपथमध्ये 4 वर्षे नोकरी करून परतल्यानंतर त्यांना पोरगी कोण देणार? असा सवाल त्यांनी केला आहे. त्यावर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी कन्हैया कुमारला टोमणा मारला आहे. जेएनयुमध्ये 10 ते 12 वर्षे शिक्षण घेऊनही अजून तुला कोणी मुलगी का दिली नाही? मग अग्निविराच्या पंचायती तुला कशाला? असा खोचक सवाल भातखळकर यांनी केला आहे
“निवडणुकीमध्ये भाजप मतांसाठी दबाव, अन् दहशत निर्माण करतील”; संजय राऊत
काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील या योजनेवरून केंद्र सरकारवर टिका केली आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनीही केंद्र सरकारच्या या योजनेला विरोध केला आहे. त्यामुळे काही ठिकाणी रेल रोको, रस्ता रोको करत तरूणांनी मोठ्या प्रमाणावर जाळपोळ केली असून काही ठिकाणी परिस्थिती ही हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी तरूणांवर लाठीचार्ज देखील केला होता.
“आघाडीतील काही आमदारांशी भाजपकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न”; थोरातांचा खळबळजनक दावा
दरम्यान, चार वर्ष देश सेवा केल्यानंतर त्यातील 25 टक्के तरूणांना पुढील देशसेवेत दाखल करता येईल, असं त्या योजनेत म्हटलं आहे. मग 4 वर्षानंतर त्या तरूणांचं पुढे काय होणार ? असा सवाल विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारला केला जात आहे. त्यामुळे या योजनेवर केंद्र सरकार सध्या विचारविनिमय करीत आहे.
अग्नीपथमध्ये ४ वर्षे नोकरी करुन परतल्यानंतर पोरगी कोण देणार?, ‘अग्निपथ’वर कन्हैय्या कुमारचा सवाल.
JNU मध्ये १०/१२ वर्षे शिक्षण घेऊनही अजून तुला कोणी मुलगी का दिली नाही? मग अग्निविरांच्या पंचायती तुला कशाला? pic.twitter.com/WJFFtuFjBQ— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 19, 2022
Read also:
- “विधान परिषदेच्या निवडणुकीतही देवेंद्र फडणवीसांची जादू चालणार”; रामदास आठवले
- राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेसाठीही जगताप, टिळक मुंबई दाखल होणार
- “पावसात भिजण्यापेक्षा विचाराने भिजू, उद्याची निवडणूक आपणच जिंकणार”; उद्धव ठाकरे
- “देवेंद्र पेक्षा हितेंद्र पावरफुल ठरणार, कोणी कितीही लोटांगण घाला”
- “उद्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान, तर शरद पवार दिल्लीकडे रवाना”; राजकीय घडामोडींना वेग