मुंबई : केंद्र सरकारने 18 ते 21 या वयोगटातील तरूणांसाठी आणलेल्या अग्निपथ या योजनेला देशभरातून जोरदार विरोध होत आहे. देशातील राजस्थान, बिहार आणि तेलंगाणा सारख्या राज्यांमध्ये काही हिंसक घटना देखील बघायला मिळाल्या. राजकीय नेत्यांशी देखील या योजनेवरून केंद्र सरकारवर जोरदार टिका केली आहे. यावर आता काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“देवेंद्र पेक्षा हितेंद्र पावरफुल ठरणार, कोणी कितीही लोटांगण घाला”
अग्निपथसारखी फोल योजना आणून देशाच्या तरूणांची चेष्टा केंद्र सरकार करीत आहे. त्यामुळेच त्यांच्याविरोधात तरूणांच्या आक्रोशाचा वणवा पेटला. मी देशाच्या तरूणांना विनंती करतो की कायदा हातात घेऊ नका आणि अहिंसेचा मार्ग स्विकारा, पंरतु ज्या भाजपच्या सरकारने ही योजना आणली त्यांना सत्तेबाहेरची वाट दाखवण्यासाठी काॅंग्रेसला सहयोग करा, असंही नाना पटोले म्हणाले.
“उद्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान, तर शरद पवार दिल्लीकडे रवाना”; राजकीय घडामोडींना वेग
अग्निपथ योजनेविरोधात देशभरात तरुणांच्या आक्रोशाचा वणवा पेटला आहे. तरुण रस्त्यावर असताना काँग्रेस पक्ष स्वस्थ बसून राहणार नाही तर, जनतेप्रती असलेल्या कर्तव्याचे पालन करेल, असं त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने आणणलेल्या अग्निपथ योजनेविरोधात काॅंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे गेल्या दोन ते तीन दिवसापासून राजकीय वातावरण चांगलंच चिघळलं आहे.
सेनेलाच मत देणार, शिवसेना आमदारांची भूमिका; तर मुख्यमंत्र्यावर काॅंग्रेसकडून दवाब
दरम्यान, भारतीय सैन्यदलात भरती होण्यासाठी सद्यस्थिती अतिशय सक्षम अशी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतून निवडलेल्या सैन्यदलाने अतिशय उत्तम सेवा दिली आहे. याच प्रक्रियेतून निवडलेल्या सैन्यदलाने भारतीय सीमांचे रक्षण प्राणपणाने तर केलेच याशिवाय अनेक अडचणींच्या काळात दर्जेदार सेवा देखील बजावली आहे. या पार्श्वभूमीवर ही नवी योजना आणून सरकारने गोंधळाचे वातावरण निर्माण केले असून आपल्या अदूरदृष्टीचे दर्शन घडविले आहे. अग्नीवीरसारख्या योजना राबवून भारतीय संरक्षण दल या अतिशय महत्वाच्या संस्थेशी छेडछाड करण्यात येत आहे. असा आरोप देखील सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारावर केला आहे.
Read also:
- “भारतीय संरक्षण दलासारख्या संस्थेशी छेडछाड करण्याचा भाजपचा प्रयत्न”; अग्निपथ योजनेवरून सुळेंचा भाजपवर हल्लाबोल
- JNU मध्ये 12 वर्षे शिक्षण घेऊनही तुला कोणी मुलगी का दिली नाही? अग्निपथ योजनेवरून भाजपचा सवाल
- “विधान परिषदेच्या निवडणुकीतही देवेंद्र फडणवीसांची जादू चालणार”; रामदास आठवले
- राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेसाठीही जगताप, टिळक मुंबई दाखल होणार
- “पावसात भिजण्यापेक्षा विचाराने भिजू, उद्याची निवडणूक आपणच जिंकणार”; उद्धव ठाकरे