मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा कोणताही डाव यशस्वी होणार नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील सहाच्या सहा आमदार या निवडणुकीत विजयी होतील, अशी आशा अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी संजय राऊत यांच्याबाबत देखील सुचक वक्तव्य करत एक इशाराही दिला आहे.
JNU मध्ये 12 वर्षे शिक्षण घेऊनही तुला कोणी मुलगी का दिली नाही? अग्निपथ योजनेवरून भाजपचा सवाल
राज्यसभेच्या निवडणुकीत एक उमेदवार पराभूत झाल्याने त्यांचा खापर आमच्यावर फोडण्यात आला. त्यामुळे आता विधान परिषदेच्या निवडणुकीत जर उमेदवार निवडून आला तर ते आमच्याविषयी काय चांगलं बोलणार ते आता पहावं लागणार आहे. असंही म्हणत देवेंद्र भुयार यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. मी पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडीसोबत आज आहे आणि उद्या देखील असणार आहे.
“विधान परिषदेच्या निवडणुकीतही देवेंद्र फडणवीसांची जादू चालणार”; रामदास आठवले
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या 105 आमदार तर काॅंग्रेसच्या 35 आमदारांनी मतदान केलं आहे. अजूनही 9 आमदारांचं मतदान अजून बाकी आहेत. भाजपकडून देखील लक्ष्मण जगताप यांचं मतदान बाकी आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पाच आमदारांचं मतदान बाकी आहे. यामध्ये जयंत पाटील अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि मोहिते पाटील यांचं मतदान बाकी आहेत. बारापर्यंत 203 आमदारांचं मतदान झालं आहे.
राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेसाठीही जगताप, टिळक मुंबई दाखल होणार
दरम्यान, दरम्यान, काॅंग्रेसकडे सध्या ४२ मते असून दुसऱ्या उमेदवारासाठी त्यांना अतिरिक्त १० मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. दुसरीकडे भाजपने राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे यांच्या पराभवासाठी रणनिती आखल्याचं बोललं जात आहे. मात्र काॅंग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना आपल्या वाट्याची काही मते त्यांना देणार असल्याची बातमी समोर येत आहे.
Read also:
- “मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा”; भाजपच्या नेत्याचं सुचक वक्तव्य
- “मी पुन्हा येईन”, रोहित पवारांनी काढली फडणवीसांची जुनी आठवण
- “गद्दारी करून सत्तेत आलेल्या सरकारला आमदार योग्य उत्तर देणार”
- “भाजपला सत्तेबाहेर काढण्यासाठी काॅंग्रेसला सहयोग करा”; अग्निपथ योजनेवरून पटोलेंचं तरूणांना आवाहन
- “भारतीय संरक्षण दलासारख्या संस्थेशी छेडछाड करण्याचा भाजपचा प्रयत्न”; अग्निपथ योजनेवरून सुळेंचा भाजपवर हल्लाबोल