मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षीय आमदारांचं मतदान पुर्ण झालं आहे. त्याचा ऩिकाल आज सायंकाळी लागणार आहे. दोन्ही बाजूंनी आमचेच उमेदवार विजयी होतील असा दावा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी आज कुणी पावसात भिजलं तरी त्याचा निवडणुकीवर परिणाम होणार नाही, असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
“उमेदवार निवडून आल्यास संजय राऊत काय बोलणार ते आता मी पाहणार”; देवेंद्र भुयार
विधानभवनात आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. यावेळी पावसाने देखील जोरदार हजेरी लावली आहे. राजकीय पक्षांकडून अनेक दावे-प्रतिदावे सुरू असताना गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मुंबईत पाऊस देखील सुरू आहे. त्यामुळे आज कुणी पावसात भिजलं तरी त्याचा निवडणुकीवर परिणाम होणार नाही.
“मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा”; भाजपच्या नेत्याचं सुचक वक्तव्य
भाजप लोकशाहीवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. त्यामुळे या राज्यात २०१९ चा जो विश्वासघात झाला. जनतेने दिलेल्या कौलाच्या पाठीत खंजीर खुपसून सरकार स्थापन करण्यात आलं. पंरतु आमदारांना पहिल्यांदा त्यांचं मत व्यक्त करण्याची योग्य संधी आली आहे. ज्या लोकांमधून हे आमदार निवडून आले आहेत, त्या लोकांनी युतीचं सरकार येण्यासाठी १६१ आमदार युतीचे निवडून दिले होते. त्यामुळे आज हे सर्व आमदार मतदानातून व्यक्त होतील असंही ते म्हणाले.
“मी पुन्हा येईन”, रोहित पवारांनी काढली फडणवीसांची जुनी आठवण
दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान झालं आहे. त्या निवडणुकीची मतदान मोजणी लवकरच सुरू होणार असून त्याचा निकाल देखील आजच लागणार आहे. यामध्ये दहाव्या जागेवर कोण बाजी मारणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- “लक्ष्मण जगतापसारखा नेता कोणीच असू शकत नाही”; देवेेंद्र फडणवीसांनी मानले आभार
- “पुढचा मुख्यमंत्री प्रहारचाच, हम बोलेंगे वैसे ही सरकार चलेगा”; बच्चू कडू
- “भाजपचा बडा नेता अजित पवारांच्या भेटीला”; खडसेही उपस्थित, राजकीय वर्तुळात चर्चा
- “सेनेला मतदान देण्यासाठी माझ्यावर मुख्यमंत्र्यांकडून दबाव”; रवी राणांचा गंभीर आरोप
- “पंकजा मुंडे अन् नाथाभाऊंची झालेली गळचेपी याचा फटका भाजपला बसणार”