मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला मत देण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे. त्याचबरोबर या निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे. असं देखील वक्तव्य रवी राणा यांनी केलं असून भाजपचे पाचही उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
“भाजपला सत्तेबाहेर काढण्यासाठी काॅंग्रेसला सहयोग करा”; अग्निपथ योजनेवरून पटोलेंचं तरूणांना आवाहन
बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या 56 वर्षात केलं नाही ते तुम्ही राष्ट्रवादी आणि काॅंग्रेससोबत अडीच वर्षात केले आहे. काॅंग्रेसच्या पायाशी जाण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलेले आहे. त्यामुळे जनता तुम्हाला योग्य तो धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरे यांनी मला रोखण्यासाठी पोलिसांचा वापर केला असता पंरतु मी वेळेत विधिमंडळाच्या परिसरात दाखल झालो असंही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून आले होते. त्याच पद्धतीने आज विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील भाजपचे पाचही उमेदवार निवडून येणार आहेत. असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
JNU मध्ये 12 वर्षे शिक्षण घेऊनही तुला कोणी मुलगी का दिली नाही? अग्निपथ योजनेवरून भाजपचा सवाल
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या 105 आमदार तर काॅंग्रेसच्या 35 आमदारांनी मतदान केलं आहे. अजूनही 9 आमदारांचं मतदान अजून बाकी आहेत. भाजपकडून देखील लक्ष्मण जगताप यांचं मतदान बाकी आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पाच आमदारांचं मतदान बाकी आहे. यामध्ये जयंत पाटील अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि मोहिते पाटील यांचं मतदान बाकी आहेत. बारापर्यंत 203 आमदारांचं मतदान झालं आहे.
Read also:
- “पंकजा मुंडे अन् नाथाभाऊंची झालेली गळचेपी याचा फटका भाजपला बसणार”
- “उमेदवार निवडून आल्यास संजय राऊत काय बोलणार ते आता मी पाहणार”; देवेंद्र भुयार
- “मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा”; भाजपच्या नेत्याचं सुचक वक्तव्य
- “मी पुन्हा येईन”, रोहित पवारांनी काढली फडणवीसांची जुनी आठवण
- “गद्दारी करून सत्तेत आलेल्या सरकारला आमदार योग्य उत्तर देणार”