मुंबई : महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभावाचा सामना करावा लागला. त्यानंतर ठाकरे सरकारला मोठे भुकंपाचे हादरे बसालया सुरूवात झाली आहे. कारण शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे आपल्या 13 पेक्षा अधिक आमदारांसह सुरतला गेल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीचं सरकार कोसळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
आघाडीतील 21 मतं फुटली कोणी बाजी मारली, कोणाची रणनिती फेल ठरली
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आमदारांमध्ये खदखद सुरू झाली. आघाडीतील मोठे नेते मतदान झाल्यानंतर लगेच विधानभवनाच्या परिसरातील निघून गेले. त्याच वेळी एकनाथ शिंदे यांचा फोन नॉच रिचेबल असल्याची माहिती समोर आली. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
दहाव्या जागेसाठी लाड अन् जगताप यांच्यात लढत, पण गेम झाला तो चंद्रकांत हंडोरेंचा
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे दोन मंत्री देखील आहेत. यामध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे. त्याचबरोबर बालाजी किणीकर, संजय शिरसाट, शांताराम मोरे, महेंद्र दळवी आणि नाशिक आणि औरंगाबादमधील सहाच्या सहा आमदारांनी एकनाथ शिंदे यांची वाट धरली आहे.
शिवसेनेने करून दाखवलं; सचिन अहिर, आमशा पाडवी यांच्या अंगावर गुलाल
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील काही नेत्यांच्या मनात धडकी भरली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्ली दौरा रद्द केला आहे. तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या बैठका सुरू झाल्या आहेत. कॉंग्रेसचे नेते देखील दिल्लीत बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहे.
Read also:
- राष्ट्रवादीची पहिल्या पंसतीची मते निंबाळकर यांना, खडसेंना दुसऱ्या पसंतीची मते
- देश वेठीस धरण्यासाठी विरोधकांची धंदेवाईक दलालांशी हातमिळवणी! गोपीचंद पडळकर यांचा आरोप
- काॅंग्रेसने घेतलेले आक्षेप निवडणुक आयोगाने फेटाळले, मतमोजणीला सुरूवात होण्याची शक्यता?
- काॅंग्रेसला अवदसा आठवली, योध्यांचाही अपमान, निष्ठावंतांची किंमतच कशी कळणार?
- भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसचा आक्षेप