मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी इडीने अलिकडेच अटक केली. त्यानंतर आता त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देखील इडीने समन्स बजावले आहेत. यातच आता संजय राऊत आणि वर्षा राऊत यांची आता इडीकडून एकत्रित चौकशी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर संजय राऊत यांची इडीची कोठडी आता 8 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
आता कसं, डॉक्टर म्हणतील तसं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तब्ब्येत बिघडली
पत्राचाळ प्रकरणात प्रवीण राऊत यांना एचडीआयएल ग्रुपकडून 112 कोटी रूपये पाठवण्यात आले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रूपये वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले अशी माहिती इडीच्या वकिलांनी न्यायालयात दिली होती. त्यामुळे आता संजय राऊत यांच्याबरोबर वर्षा राऊत यांच्या अडचणीत देखील मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. इडीने सोमवारी संजय राऊत यांना मनी लॉंड्रिंग प्रतिबंधक कायदा न्यायालयाचे न्यायाधीश एम जी देशपांडे यांच्यासमोर हजर केले आणि त्यांची आठ दिवसांची कोठडी मागितली होती.
संसेदत महाराष्ट्राचा आवाज ठरला भारी; सुळेंना ‘संसद महारत्न’ अन् ‘संसद विशिष्टरत्न’ पुरस्कार
विनायक राऊत यांना आउट गोइंग माहीत नाही, त्यांना फक्त पैसे खायचे माहिती आहे म्हणून ते मुख्यमंत्र्यांवर अडणीपणाची टीका करीत आहेत. एसी कॅबिनमध्ये बसून तुम्ही सर्व ठरवा, पण राज्याचा मुख्यमंत्री लोकांमध्ये जाऊन काम करत असताना तुम्ही त्यांना अडाणी म्हणत असाल तर तुमच्या बुद्धीची कीव वाटते. असं म्हणत विनायक राऊत यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे.
“कारण खरं असेल तर, अलीबाबा व त्याच्या 40 चोरांनी राष्ट्रवादीची जाहीर माफी मागावी”
इडीने ताब्यात घेतल्यानंतर उद्धव ठाकरे जसे राऊतांच्या कुटुंबियांना भेटायला गेले तसेच यशवंत जाधव, अडसुळ, प्रताप सरनाईक यांच्या घरी देखील त्यांनी जायला हवे होते. पण बहुदा संजय राऊत आता दोन चार वर्ष बाहेर येणार नाही, याची खात्री उद्धव ठाकरेंना वाटत असेल म्हणून ते राऊतांच्या घरी गेले असावेत असा टोला देखील त्यानी लगावला.
Read also
- “मंत्रिमंडळ विस्तार प्रश्न गरजेचा नाही, पण शिवसेना प्रहारमध्ये विलीन करू नका”
- “मविआ सरकारचे निर्णय का बदलले? कोर्टात तरी खरं सांगा”; राष्ट्रवादीचा शिंदेंना सवाल
- “मुख्यमंत्री रात्री दोन वाजेपर्यंत जागतात, प्रवास करतात, थोडा वेळ तरी थांबा”
- “स्वत:वर 307 केस पडली तेव्हा यांची कडी पातळ झाली”; राऊतांवर नितेश राणेंचा प्रहार
- मोदी सरकारने जीएसटीतून शाळकरी मुलांनाही सोडले नाही; काॅंग्रेसचा उद्या जेलभरो आंदोलन