पुणे : कायदेशीर प्रक्रिया बघितली तर शिवसेना हा मुळ पक्ष हा एकनाथ शिंदे यांचाच आहे. त्यामुळे ज्या 16 आमदारांवर अपात्रतेची याचिका सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्यावर त्यांना काहीच होणार नाही. कारण एक तृतीयांश बहुमत हे एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. शिवसेना नेमकी कुणाची हा पक्षांतर्गत वाद असून आम्ही एकनाथ शिंदे यांच्या माध्यामातून शिवसेनेलाच पाठिंबा दिला. त्यामुळे प्रहारला फक्त शिवसेनेत विलीन करू नका इतकीच मागणी आहे. असं बंडखोर आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
संसेदत महाराष्ट्राचा आवाज ठरला भारी; सुळेंना ‘संसद महारत्न’ अन् ‘संसद विशिष्टरत्न’ पुरस्कार
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जवळपास 38 दिवस झाले आहेत. तरी देखील मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आले नाहीत. मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा कधी होणार ते माहिती नाही. परंतु एका महिन्यात मुख्यमंत्र्यांनी जे काही निर्णय घेतले आहेत. त्यात आम्ही खुश आहोत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत देखील ते म्हणाले की, ईडीच्या ज्या काही कारवाया होत आहेत, त्या पक्षविरहित झाल्या पाहिजे आणि ज्यांनी यामध्ये भ्रष्टाचार केला आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असंही ते म्हणाले.
“कारण खरं असेल तर, अलीबाबा व त्याच्या 40 चोरांनी राष्ट्रवादीची जाहीर माफी मागावी”
मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत देखील विरोधी पक्ष एकनाथ शिंदे यांच्यावर टिकास्त्र सोडत आहेत. अशातच आता शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या म्हणजे 5 ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तार भाजपकडून 9, तर शिंदे गटाकडून 7 जण मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं बोलण्यात येत आहे. यामध्ये चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, दादा भुसे, उदय सामंत यासारख्या नेत्यांची नावं चर्चेत आहेत.
“न्यायालयाचा ‘हा’ निर्णय सगळ्यांना प्रभावी ठरणारा होऊ शकतो”
दरम्यान, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भरगच्च कार्यक्रम हाती घेतला. त्याआधी देखील सेनेविरोधात बंड केल्यानंतर जवळपास 8 दिवस एकनाथ शिंदे हे मोठ्या प्रमाणात व्यस्त होते. त्याचाच परिणाम आज त्यांना जाणवू लागला आहे. त्यामुळे त्यांची तब्बेत बिघडली असून त्यांना विश्रांती करण्याचा सल्ला डॉक्टरांना दिला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
Read also
- “मविआ सरकारचे निर्णय का बदलले? कोर्टात तरी खरं सांगा”; राष्ट्रवादीचा शिंदेंना सवाल
- “मुख्यमंत्री रात्री दोन वाजेपर्यंत जागतात, प्रवास करतात, थोडा वेळ तरी थांबा”
- “स्वत:वर 307 केस पडली तेव्हा यांची कडी पातळ झाली”; राऊतांवर नितेश राणेंचा प्रहार
- मोदी सरकारने जीएसटीतून शाळकरी मुलांनाही सोडले नाही; काॅंग्रेसचा उद्या जेलभरो आंदोलन
- आता कसं, डॉक्टर म्हणतील तसं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तब्ब्येत बिघडली