मुंबई : सिंधुदुर्गात होत असलेला आयुष मंत्रालयाचा प्रकल्प मंत्री अमित देशमुख लातूरला नेण्याची मागणी केल्याने महाविकास आघाडीत बिघाडाची ठिणगी पडण्यास सुरुवात झाली होती. कोकणातला प्रकल्प लातूरला नेण्याची मागणी केल्याने शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली होती. देशमुख यांनी आता त्या टीकेला उत्तर दिले आहे.
या प्रकल्पासाठी आधी जळगावची जागा निश्चित झाली होती. पण ती जागा योग्य नसल्याने इतर जागांबाबत विचार सुरु आहे. त्यामुळे कोणीही प्रकल्प पळवलेला नाही, असं स्पष्टीकरण अमित देशमुख यांनी दिलं.
सिंधुदुर्गाच्या वाट्याला येणारा प्रकल्प पळवून नेण्याच्या प्रयत्नाचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो. कोकणातले असे अनेक प्रकल्प पळवण्याचे प्रयत्न झाले आहेत,अशा तीव्र शब्दात विनायक राऊत यांनी अमित देशमुख यांच्यावर निशाणा साधला होता.अमित देशमुख यांनी केलेला हा प्रकार निंदनीय आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख असते तर अशा घटना घडल्या नसत्या. त्यांचं प्रेम वेगळं होतं. पण अमित देशमुखांनी आम्हाला भेटण्यासाठी वेळ दिली नाही.असेही राऊत यांनी म्हंटले होते आता या टीकेला अमित देशमुख यांनी उत्तर दिले आहे.
प्रशासकीय बाबीत भावनाविवश होऊन भाष्य करणं आवश्यक नाही, चर्चेने हा प्रश्न सोडवू शकतो, असं उत्तर अमित देशमुख यांनी दिलं. तसंच उदय सामंत यांना नेहमी भेटतो, महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. कोणीही प्रस्ताव पाठवला तर तो केंद्रला जाणार आणि ते निर्णय घेणार, असंही देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
Read Also
मराठा आरक्षणासाठी दोनीही राजे येणार एकाच मंचावर ? उदयनराजेंच्या ‘या’ विरोधकाचा पुढाकारhttps://t.co/7AejuBVJhD#Chhatrpatisambhajiraje #ChhatrpatiUdayanRaje #Bjp@YuvrajSambhaji @Chh_Udayanraje @NarendraMathadi
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 6, 2020