शिरूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलचं तापायला लागलं आहे. याठिकाणी पवार विरूद्ध पवार अशी लढत असून प्रत्यक्ष मैदानात शिवाजीराव आढळराव तर विरोधात अमोल कोल्हे रिंगणात उतरले आहेत. दोन्ही बाजूंच्या प्रचार यंत्रणा आता चांगल्याच सक्रीय झाल्या आहेत. मागच्या पाच वर्षात काहीच विकासकामे केली नाहीत म्हणून अमोल कोल्हे यांच्यावर नागरिकांची प्रचंड नाराजी असल्याचं दिसून येत आहे. ती नाराजी आता उघडउघडपणे दिसायला लागली आहे.
मूळचे अभिनेते म्हणून प्रसिद्ध असलेले अमोल कोल्हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर गेल्या पाच वर्षात अनेक गावांमध्ये ते फिरकले नसल्याचा आरोप आढळराव पाटील यांच्याकडुन नुकताच करण्यात आला होता, त्यातच आता अनेक गावांच्या वेशीवर “अमोल दादा, तब्बल पाच वर्षानंतर आपले आमच्या गावात सहर्ष स्वागत : आपलाच 2019 चा विश्वासू मतदार” अशा आशयाचे बॅनर अनेक ठिकाणी लागले असल्याचे पाहायला मिळत आहेत.
अमोल कोल्हे यांच्याबद्दल लागलेल्या बॅनर्स ची चर्चा सध्या शिरूर लोकसभेत सर्वत्र होत असून, गेल्या पाच वर्षात खासदार म्हणून डॉ. अमोल कोल्हे यांचा जनसंपर्क कमी असून नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यात ते कमी पडले असल्याच्या चर्चा अनेक गावांमध्ये आहे.
त्याउलट माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे खासदार नसतानाही गेल्या पाच वर्षात त्यांनी जनसंपर्क चांगला ठेवला असून नागरिकांचे प्रश्न समजून त्यांची कामे करण्याची आढळराव पाटील यांची भूमिका राहिल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. कोरोना काळातही शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अनेक गावांमध्ये नागरिकांना मदत पुरविल्याचे अनुभव नागरिक व्यक्त करत आहेत. आता गावांच्या वेशीवर लागलेल्या खोचक स्वागताच्या बॅनर्स बद्दल अमोल कोल्हे काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“इतका सच्चा, तत्वनिष्ठ, सज्जन, साधा, भोळा…” मनसेचं उद्धव ठाकरेंना खोचक पत्र
हेही वाचा…पुण्यात कॉंग्रेसमध्ये भडका, फडणवीसांसोबत चर्चा, आबा बागुल भाजपच्या वाटेवर ?
हेही वाचा…“ही निवडणुक भावकी, गावकीची नाही, “अजित पवार यांचं मोठं वक्तव्य
हेही वाचा…“ही निवडणुक भावकी, गावकीची नाही, “अजित पवार यांचं मोठं वक्तव्य
हेही वाचा. “श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून ५०० कोटी रुपये खाल्ले “, मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्रावर गंभीर आरोप