नवीदिल्ली : करोनाची स्थिती हाताळण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी,” असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. कंगना रणौत आणि शिवसेना वादावर बोलताना नवनीत राणा यांनी म्हटलं की, “तिने फक्त आपल्याबद्दल बोलावं, इतरांबद्दल नाही. बॉलिवूडने तिला सर्व काही दिलं असून त्यावर आरोप करु नयेत.
“कुठे ना कुठे मुख्यमंत्र्यांचं राऊतांना समर्थन आहे असं वाटत आहे. जर मुख्यमंत्र्यांचं राऊत यांना समर्थन असेल तर मुख्यमंत्री बाहेर येऊन त्यांचं समर्थन करतील आणि जर त्यांचा राऊत यांना विरोध असेल तर त्यांनी राऊत यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा घ्यावा,” अशी मागणी राणा केली होती.
याआधी नवनीत राणा यांनी शिवेसना खासदार संजय राऊत यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. “संजय राऊत यांनी राज्याचा ठेका घेतला आहे का ? त्यांनी महिलांचा अपमान केला आहे. ते सतत महिलांचा अपमान करत आहेत. त्यांनी आपली मर्यादा साभाळावी,” असं राणा यांनी म्हटलं होतं.
Read Also
सिनेसृष्टीप्रमाणे राजकारण आणि क्रिकेटमध्येही ड्रग अॅडिक्ट : नवनीत राणाhttps://t.co/W5A53vW0uC#NvneetRana #MarathiNews #PoliticalMaharashtra #AmravatiMP@raviranabjp
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 16, 2020