मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजपला देखील या निवडणुकीत 75 जागा मिळाल्या असून, बिहारमध्ये प्रचार करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे मोठे यश मानले जात आहे. तर दुसरीकडे बिहारमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत. आता यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली असून, शिवसेनेचा ‘शवसेना’ असा उल्लेख केला आहे.
अमृता फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ शेअर करत शिवसेनेला टोला लगावला. यामध्ये फडणवीसांनी शिवसेनेने कशाप्रकारे बिहारमधील निवडणुकीमध्ये खराब कामगिरी करुन आपले हसू करुन घेतले या विषयावर भाष्य केले आहे. बिहारमध्ये शवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारले, असे म्हणत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला.
का हय ये – शवसैना ने अपने ही साथियों की लाशें बिछा दी बिहार मे !
काय चाल्लय तरी काय – शवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहार मधे !
महाराष्ट्र कुठे ही नेला असो पण बिहार योग्य ठिकाणी नेउन ठेवल्या बाबत धन्यवाद 🐧 #Bihar #BiharResult pic.twitter.com/mMGT5Sgn3w— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 12, 2020
अमृता फडणवीस यांनी ट्विट केले की, का हय ये – शवसैना ने अपने ही साथियों की लाशें बिछा दी बिहार मे ! काय चाल्लय तरी काय – शवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहार मधे ! महाराष्ट्र कुठे ही नेला असो पण बिहार योग्य ठिकाणी नेउन ठेवल्या बाबत धन्यवाद.
दरम्यान, मुलाखतीमध्ये फडणवीसांनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. शिवसेनेने 50 जागा लढवूनही त्यांना भोपळाही फोडता आला नाही, असं सांगताना शिवसेना चित पडली तरी आपलं बोट वरती आहे असं सांगत फिरते, असा टोला त्यांनी शिवसेना लगावला.