मंगळवारी पावसाळी अधिवेशनासंदर्भात बैठक होती. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाकडून ठाकरे सरकार अस्थिर असल्याचा पुनरुच्चार झाला. अधिवेशनाच्या तोंडावर फडणवीसांनी सरकारविरोधातील आपली टीका तीव्र केल्याचे पाहायला मिळाले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सोमवारी हल्ला चढवला. महाविकास आघाडीचे सरकार हे अनैसर्गिक युतीची सत्ता असलेले सरकार असून त्यात अंतर्विरोध आहेत. त्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असा दावा त्यांनी केला.
’धोकादायक इमारतींची संख्या किती आहे हे तपासले पाहिजे, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. सुशांतसिंह प्रकरणावर बोलताना त्यांनी लवकरच सीबीआय चौकशी पूर्ण करेल आणि सत्य समोर येईल, असा विश्वास व्यक्त केला. फडणवीस यांनी या वेळी ठाकरे सरकारने भाजप आमदारांची त्यांच्या मतदारसंघातली मंजूर झालेली विकास कामे रद्द केल्याचा आरोप केला. याप्रकरणी न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.
हे देखील वाचा
आता एक पक्ष नाराज, पुढच्या काळात सर्वच पक्षांची नाराजी बाहेर येईल ! विखेंची भविष्यवाणीhttps://t.co/MiZDt7SaQp@drsujayvikhe @BJP4Maharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) August 26, 2020