मुंबईः रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली आहे, त्यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. “अर्णब हा भाजपचा प्रवक्ता आहे. म्हणून भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत. त्यांच्या पक्षाचा तो राष्ट्रीय कार्यक्रम असेल”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीचं म्हणणं ऐकून भाजपच्या हृदयाला पाझर फुटला नसेल तर त्यांनी मानवता, न्याय, सत्य या शब्दांचा वापर यापुढे कधीही करू नये, असा टोलाही शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लगावला आहे.
महाराष्ट्राचे पोलीस म्हणजे कळसूत्री बाहुल्या नाहीत. त्यांनी कारवाई केली याचा राजकारणाशी संबंध नाही. अर्णब गोस्वामी हे भाजप कार्यकर्ते आहेत. सामना शिवसेनेचे मुखपत्र आहे, कार्यकर्त्यांनी कोणत्या प्रकारचा गुन्हा केलाय हे समजायला हवं. त्याच्यावर केलेली कारवाई ही पत्रकार म्हणून नाही. त्याने कोणाला तरी हक्काचे पैसे दिले नाहीत त्यामुळे ते कुटुंब उद्ध्वस्त झालं. त्यातून त्यांनी आत्महत्या केली आणि कोणामुळे आत्महत्या केली ते लिहून ठेवलं, जे सुशांत सिंग प्रकरणात नव्हतं, हेसुद्धा संजय राऊतांनी अधोरेखित केले आहे.
Read also
धक्कादायक..! अर्णब गोस्वामींनी केली महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण
“गोस्वामी काय भाजपचा कार्यकर्ता आहे का?”; शिवसेनेचा भाजपला टोला