मुंबई : वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. यावरून आता ठाकरे सरकारवर विरोधी पक्ष जोरदार टीका करत आहेत. शिवसेना आणि काँग्रेसची ही आणीबाणीची मानसिकता असल्याची टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या प्रकरणावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून, मुंबईचे आणि महाराष्ट्राचे पोलीस कोणावर अन्याय आणि सुडाने कारवाई करत नाही, असे ते म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात कायद्याचे पालन केले जाते. कोणाकडेही पुरावे असल्यास पोलिस कारवाई करू शकतात. ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून बदला घेण्यासाठी कुणावरही कारवाई केलेली नाही.
The law is followed in Maharashtra. Police can take action if they have evidence against anyone. Since the formation of Thackeray government, no action has been taken against anyone for revenge: Sanjay Raut, Shiv Sena leader pic.twitter.com/UnQK8C4HpX
— ANI (@ANI) November 4, 2020
पत्रकारितेसाठी हा काळा दिवस असल्याचं मला वाटत नाही. पत्रकारांनीही आपल्या मर्यादा पाळल्या पाहिजेत, असे राऊत म्हणाले.
चुकीचं काम केलं नसेल तर मग तो पत्रकार, राजकीय नेता, अभिनेता कोणीही असो ओरडण्याचं कारण नाही. या देशात प्रसारमाध्यमांना सर्वात जास्त स्वातंत्र्य आहे. इतकं स्वातंत्र्य कुठेच नाही. युपीमध्ये पत्रकारांवर कठोर कारवाई केली जाते त्याबद्दल कोणी बोलत नाही, असेही ते म्हणाले.