मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार निशाणा साधला आहे. आपल्या फेसबूक पेजवर एक लेख लिहून रोहित पवार यांनी राज्यघटना आणि लोकशाहीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीय. राज्यघटनेचा गाभा असलेल्या संघराज्य पद्धतीला जपण्याची जबाबदारी मोठा भाऊ म्हणून केंद्राची आहे.
रोहित पवार युनिलिहिलेल्या या लेखावरून भाजपनेही आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. “ज्यांच्या राजकारणाचे दुकान घराणेशाहीच्या खांबावर उभे आहे, त्यांनी संघराज्य, लोकशाही या विषयावर इतकं पेटून न बोललेले बरे…” अशी टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.
“कुणाचा तरी मुलगा आणि कुणाचा तरी पुतण्या म्हणून राजकारणात किंमत असलेल्यांपैकी मोदी नाही…” अशीही टीका भातखळकर यांनी रोहित पवारांवर केली आहे.