मुंबई : ‘ कोरोना संसर्गाच्या भीतीने डॉक्टरांकडून रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार होत नाहीत. अनेक ठिकाणी रुग्ण आत आणि डॉक्टर बाहेर, अशी स्थिती आहे. यामुळे मृत्यूदरात वाढ होत आहे. ही स्थिती अशीच सुरू राहिल्यास रुग्णालयांच्या बिलांसह डॉक्टरांच्या कामाचे ऑडिट करण्याची गरज असल्याचे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले होते. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जहरी टीका केली आहे.
“डॉक्टरांच्या कामाचे ऑडिट होऊन जाऊ द्या, परंतु घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कामाचे ऑडिट कोण करणार जयंतराव??’ अशा शब्दांत अतुल भातखळार यांनी जयंत पाटलांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
१०० खाटांच्या कोव्हिड केंद्राचे उद्घाटन रविवारी सकाळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी बोलताना मंत्री जयंत पाटील यांनी डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, ‘अनेक रुग्णालयांबद्दल तक्रारी वाढल्या आहेत. डॉक्टर बाहेर आणि पेशंट आत हे बरोबर नाही. डॉक्टर आतच जात नसतील तर उपचार कसे होणार? हा प्रकार गंभीर आहे, असे जयंत पाटील म्हणाले
मी यावर कधी बोललो नाही, पण आता मृत्यू दर कमी येत नसल्याने यावर बोललेच पाहिजे. रुग्णांची काळजी डॉक्टरांनी घेतली तरच मृत्यू दर कमी होईल. ऑडिट बिलांचेच नव्हे तर डॉक्टरांचेही करण्याची गरज आहे. याबाबत आमच्यासह डॉक्टरांनीही आत्मचिंतन करण्याची गरज आहे असे जयंत पाटील म्हणाले होते यावर आमदार भातखळकर यांनी सवाल उपस्थित केला आहे.
Read Also :