नवी दिल्ली : केंद्राने सादर केलेल्या कृषी विधयेकाला प्रचंड गदारोळात मंजुरी मिळाली. या दरम्यान काँग्रेसकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. त्यामुळे आज आठ खासदार निलंबित करण्यात आले आहे.उपराष्ट्रपती वैकय्या नायडू यांनी ही कारवाई केली.
काँग्रेसचे खासदार राजीव यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. राजीव सातव यांच्यासह आठ खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे. राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी ही कारवाई केली आहे. काँग्रेसच्या आठही खासदारांचे आगामी 7 दिवसांसाठी निलंबन करण्यात आले आहे.पावसाळी अधिवेशनात वादग्रस्त शेती विधेयकावरून जोरदार गदारोळ पाहण्यास मिळाला. राज्यसभेत कृषी मंत्री नरेंद्र तोमर हे बोलायला उभे राहिले असता विरोधकांनी एकच गोंधळ घातला होता.
राज्यसभेत सभागृहाची वेळ वाढविण्याच्या मुद्यावरून एकच वाद पेटला होता. कृषी मंत्र्यांनी दुसऱ्या दिवशी उत्तर देण्याची विरोधी पक्ष नेते गुलाम नवी आझाद यांनी मागणी केली होती. पण, या गोंधळात कृषी मंत्री नरेंद्र तोमर चर्चेला उत्तर देत होते.
Read Also :