मुंबई : मुंबई महापालिकेनं कंगनाचा बंगला आणि कार्यालयावर चालवलेला हातोडा अवैध असल्याचा म्हणत मुंबई हायकोर्टानं ताशेरे ओढले आहे. यावरून आता महाविकास आघाडी सरकारवर भाजपनं हल्लाबोल केला आहे. अर्णब गोस्वामी पाठोपाठ कंगना प्रकरणात ठाकरे सरकारचं थोबाड फुटलं. हायकोर्टानं सरकारवर कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
मुंबई महापालिकेनं कार्यालयावरील तोडकाम प्रकरणाची कंगनाने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. शुक्रवारी मुंबई हायकोर्टानं या याचिकेवर आपला निकाल दिला. कंगना रणौतच्या बंगल्यावर केलेली महापालिकेची कारवाई मुंबई हायकोर्टाने अवैध ठरवली आहे.
‘महापालिकेने कंगनाला दिलेली नोटीस अवैध आहे. त्यामुळे त्याविषयी महापालिकेला भरपाई करावी लागेल. कंगनाच्या विनंतीचा विचार करण्यासाठी नुकसानीचे मूल्यमापन नंतर केले जाईल आणि त्याविषयीनंतर निर्णय दिला जाईल’, असा निर्णय न्या. शाहरुख काथावाला व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने दिला आहे.
मुंबई मनपाची कारवाई नागरिकांच्या हक्कांविरोधात आहे, असं मतही न्यायाधिशांनी नोंदवलं आहे. त्यामुळे कंगनाला महापालिकेचा भरपाई द्यावी लागणार आहे.