मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यलयावर बीएमसीने हातोडा मारल्यावर विरोधकांकडून सरकारवर सडकून टीका होत आहे . यावर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत शिवसेनेवर सवाल उपास्थित केला आहे.
“महाराष्ट्राच्या परिवहन मंत्री अनिल परब यांना त्यांच्या कार्यालयाच्या अवैध बांधकाम प्रकरणी एक वर्षापूर्वी नोटीस देण्यात आली आहे. ते अनधिकृत कार्यालय अजून का तोडण्यात आले नाही? शिवसेनेचे मंत्री कायद्यापेक्षा मोठे असतात काय? “असा सवाल विचारत त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे .
राज्यात सध्या सरकार आणि कंगनामध्ये चांगलेच राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे.कंगना मुंबईमध्ये दाखल होताच तिने मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा भडिमार केला. दरम्यान कंगना मुंबईत दाखल होण्याआधीच बीएमसीकडून कंगणाच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली.या कारवाईवर विरोधकांनी सरकारवर हल्ला केला. कंगनाकडूनही सरकारवर आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्राच्या परिवहन मंत्री अनिल परब यांना त्यांच्या कार्यालयाच्या अवैध बांधकाम प्रकरणी एक वर्षापूर्वी नोटीस देण्यात आली आहे. ते अनधिकृत कार्यालय अजून का तोडण्यात आले नाही? शिवसेनेचे मंत्री कायद्यापेक्षा मोठे असतात काय? pic.twitter.com/IN1Dze521W
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 10, 2020