मुंबई : कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेडच्या कामास उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्यातील राजकारण चांगले तापले आहे. ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. कांजूरमार्ग येथील कामास स्थगिती दिल्यानंतर सरकार पर्यायी जागा शोधत असल्याची देखील सांगितले जात आहे.
राज्य सरकारकडून यासाठी पॅनेल देखील गठीत केला होता. आता यावरून भाजपकडून सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.
सौनिक समितीतील सदस्यांनी मुंबई आणि उपनगरांत सर्व ठिकाणी भेटी दिल्या आणि त्यानंतर एक अहवाल सादर केला. त्या अहवालात मेट्रो ३ च्या कारशेडसाठी आरे व्यतिरिक्त दुसरा योग्य पर्याय नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावरून आता भाजपने ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे.
आरे कारशेडचे सगळे पर्याय अव्यवहार्य… समितीचा अहवाल…
तोंड फोडून घ्यायची आवड असलेले महा निर्लज्ज आघाडी सरकार… @OfficeofUT pic.twitter.com/5kl3Lc8HOA— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 25, 2020
आरे कारशेडचे सगळे पर्याय अव्यवहार्य… समितीचा अहवाल… तोंड फोडून घ्यायची आवड असलेले महा निर्लज्ज आघाडी सरकार, असे म्हणत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारची खिल्ली उडवली आहे.