मुंबई : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार भावना गवळी यांचं तिकीट कापून त्यांच्या जागी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. या निर्णयामुळे भावना गवळी फार नाराज झाल्यात. त्यानंतर भावना गवळी या राजश्री पाटील यांच्या प्रचारात देखील कुठेच दिसल्या नाहीत. यातच आता त्यांनी पत्रकारांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केलीय.
भावना गवळी म्हणाल्या की, लहानपणापासून मला शिवसेनेचं बाळकडू मिळालं आहे. २५ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक पद उपभोगली असती पण माझं लक्ष पदावर नव्हतं. जनतेने माझ्यावर विश्वास टाकलाय. माझ्यासाठी पक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्वाचे आहेत. मी इतकी इतकी वर्षे काम केलंय. बाकीच्या खासदारांना उमेदवारी मिळाली. याची मला खंत वाटली. माझ्या वडिलांनी शिवसेनेचे काम 1985 पासून सुरु केले. पण मुख्यमंत्र्यांचे हात मजबूत करण्यासाठी मी मैदानात उतरणार आहे. असेही भावना गवळी म्हणाल्या.
हेही वाचा…“आमच्या रक्तात राष्ट्रवादी, ह्यदयात भाजप तर हातात धनुष्यबाण”, मल्हार पाटलांचं मोठं विधान
दरम्यान, मी इतकी वर्षे काम केले. उमेदवारी न मिळाल्याने मला खंत वाटली. शिवसेनेसाठी माझ्या घराने योगदान दिलंय. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात काम उभ केलं. रात्रीचे 12 वाजेपर्यंत ते काम करतात. त्यामुळे मी महायुतीचे उमेदवार जयश्री पाटलांच यांचे काम करणार आहे. यवतमाळ-वाशिममधून महायुतीकडून जयश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा आपण प्रचार करणार आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.
READ ALSO :
हेही वाचा…“तुतारीचा आवाज ऐका, पण घड्याळाशिवाय काही चालत नाही”,शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमनेसामने
हेही वाचा..पुण्यात मोहोळांची की धंगेकरांची ताकद ? ; आगामी लोकसभा निवडणुकीबाबत पुणेकरांचं मतं काय?
हेही वाचा…नरेंद्र मोदी की राहुल गांधी, आगामी पंतप्रधानांबाबत पुणेकर नेमकं काय म्हणतात?
हेही वाचा…“राजकारण करणारे राजकारण करत राहतील परंतु आम्ही..” सुनील तटकरेंचं मोठं विधान