पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दहा वर्षांची कारकीर्द सर्वोत्तम असल्यामुळे तिसऱ्यांदा ते पंतप्रधान होणार आहेतच. त्यांचे हात बळकट करण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयी करण्यासाठी आपण सगळे कामाला लागू या. भोसरी विधानसभा मतदारसंघातून आढळराव यांना एक लाखापेक्षाचे अधिकचे मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी माझी, असे प्रतिपादन भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केले. वाघोली येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजर पदाधिकाऱ्यांची सा समन्वय बैठक घेतली. या वेळी आमदार लांडगे बोलत होते.
हेही वाचा…“अहंकारी सत्ताधाऱ्यांचा या निवडणूकीत करेक्ट हिशोब केल्याशिवाय गप्प बसणार नाही”
यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार राहुल कुल, हडरसरचे माजी आमदार योगेश टिळेकर, माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, आशाताई बुचके, जयश्री पलांडे, आबा तुपे, जयसिंग एरंडे, डॉ. ताराचंद कराळे, राम गावडे, संतोष खैरे, आदींसह शिरूर लोकसभेतील भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा…“दोन तुकडे करायचे आणि आपणच त्याला नकली म्हणायचं”, जयंत पाटलांचा अमित शाहांना टोला
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगामध्ये भारताचा आदरयुक्त दबदबा निर्माण झाला आहे. राज्यामध्ये महायुती आहे. सगळ्यांच्या विचाराने शिवाजीराव आढळराव यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांना सर्वाधिक मतांनी विजयी करण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. खासदार अमोल कोल्हे या मतदारसंघात कधी फिरकले नाहीत. याउलट शिवाजी आढळराव यांनी मागील पाच वर्षांत मतदारसंघात जास्तीत जास्त कामे केली आहेत.
दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बैठकीमुळे भोसरी व जुनर तालुक्यासह आंबेगाव, खेड, शिरूर, हवेली व हडपसरमधील भाजप कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागणार असल्याने शिवाजीराव आढळराव यांना अधिक बळ मिळण्यास फायदा होणार आहे. दख्यान, महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांना मताधिक्य मिळवून देण्याचे वचन सर्व पदाधिकान्यांनी यावेळी दिले.
READ ALSO :
हेही वाचा…““..त्यामुळेच मला पुण्याचा खासदार व्हायचंय”, वसंत मोरेंनी सांगितला धक्कादायक अनुभव
हेही वाचा…“सुपारी वाजवणारा” अशी पदवी देवेंद्र फडणवीस यांनीच राज ठाकरेंना दिली, कुणी डिवचलं ?