IMPIMP
bjp bjp

महाराष्ट्रात जे राजकारण खेळले ते बिहारमध्ये करू नका

 

जळगाव : भाजप कार्यकर्ते प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी एकनाथ खडसे यांच्या राजकीय जीवनावर लिहिलेल्या ‘जनसेवेचा मानबिंदू : एकनाथराव खडसे’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज दुपारी मुक्ताईनगर येथे खडसेंच्या फार्महाऊसवर ऑनलाइन पद्धतीने पार पडला. या सोहळ्यानंतर बोलताना खडसेंनी फडणवीसांना टोला लगावत महाराष्ट्रात जे तिकीट कापण्याचे खेळ खेळले ते बिहारमध्ये करू नका असे म्हंटले आहे.

एकनाथ खडसे म्हणाले की, फडणवीस यांना बिहार विधानसभेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेतच. बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजपात युती आहे. त्यामुळे आमचे सरकार येईल, अशी आशा करतो. पण देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकच अपेक्षा करतो, त्यांनी महाराष्ट्रात जे राजकारण खेळले, याचे तिकीट कापायचे, त्याचे तिकीट कापायचे, याला पाडण्यासाठी प्रयत्न करायचे, त्याला पाडण्यासाठी प्रयत्न करायचे, असे तिथे होऊ नये, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांना चिमटा काढत आपली नाराजी बोलून दाखवली.

खडसेंनी केली आहे स्वतः पुस्तक लिहिण्याची घोषणा
दरम्यान, एकनाथ खडसे यांच्यावर पुस्तक आलं असलं तरी खुद्द खडसे यांनीही एका पुस्तकाची घोषणा आधीच केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध गेले काही दिवस मोहीम उघडणारे खडसे ‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ हे पु्स्तक लिहून त्यात फडणवीसांविरुद्ध अनेक गौप्यस्फोट करणार आहेत.

हॅकर मनीष भंगाळेने रात्री दीड वाजता कृपाशंकर सिंह यांच्यामार्फत घेतलेली भेट, विधानसभा निवडणुकीत झालेली तिकिटांची कापाकापी यावरून खडसे यांनी फडणवीस यांच्यावर उघड हल्ला केला आहे.

 

Read Also

 

कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईशी सरकारचा संबंध नाही : शरद पवार