नवीदिल्ली : कंगना प्रकरणाशी सरकारचा काही संबंध नसून कार्यालयावर मुंबई पालिकेने कारवाई केली आहे असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे मात्र यावेळी शिवसेनेच्या भूमिकेवर बोलण्यास त्यांनी नकार दिला.दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नेमकं काय म्हणाले शरद पवार कंगना बाबत
“कंगना प्रकरणाचा सरकारशी काही संबंध नाही. कार्यालयावर कारवाई मुंबई पालिकेने केली आहे. पालिकेचे काही नियम असून त्यानुसार ते कारवाई करत असतात. कारवाईचा निर्णय सरकारचा नाही तर पालिकेचा आहे. सर्व जबाबदारी पालिकेची आहे,” असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.
मराठा आरक्षण स्थगितीवर बोलताना शरद पवार यांनी फेरविचार याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचं सांगितलं. अध्यादेश काढला तर मराठा आंदोलन होणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं. तसंच विरोधकांना राजकारण करायचं आहे, आम्हाला मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे असंही ते म्हणाले. मराठा आरक्षणावरुन केंद्र-राज्य असा वाद नको असं आवाहन त्यांनी केलं.
Read Also
मराठा आरक्षण संदर्भात सरकारने तातडीने अद्यादेश काढावा अन्यथा . . उदयनराजे गरजलेhttps://t.co/pZqHOVNdrq@Chh_Udayanraje
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 11, 2020