मुंबई : नुकतंच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांत सिंह प्रकरणावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता त्यानंतर आता अनिल देशमुख हे महाविकास आघाडीच्या सर्कशीतील जोकर आहेत अशी टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
सुशांत प्रकरणाआड छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केलं. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे. “एम्सचा रिपोर्ट जाहीर झाला आहे. कूपर आणि एम्सचा रिपोर्ट पाहिला तर त्यात कुठेही व्हिसेरामध्ये विषाचा अंश सापडला नाही. या संपूर्ण केसची चौकशी सीबीआयच्या माध्यमातू सुरु आहे. सीबीआयचा अंतिम रिपोर्ट येईल तेव्हा त्यात काय असेल याची सर्वजण वाट पाहत आहेत. लवकरात लवकर रिपोर्ट जाहीर करावा अशी आमची विनंती आहे. यामुळे सुशांतची हत्या होती की आत्महत्या हेदेखील स्पष्ट होईल,” असं यावेळी अनिल देशमुख यांनी म्हटलं.
देशमुख यांनी केलेल्या आरोपांचा भाजपकडून चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. देशमुख हे राज्यात सुरू असलेल्या महाविकासआघाडी नावाच्या सर्कशीतले जोकर आहेत असा घणाघात भटकळकर यांनी केला आहे. तसेच या आधी भाजपा सरकारवर केलेले फोन टॅपिंगचे आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत,आता सुशांतप्रकरणी त्यांनी बोगस अकाउंटचा आरोप केला आहे. आरोप सिद्ध करा नाहीतर जनतेची माफी मागून तोंड काळे करा असे देखील यावेळी अतुल भातखळकर यांनी म्हंटल आहे.
गृहमंत्री @AnilDeshmukhNCP हे राज्यात सुरू असलेल्या महाविकासआघाडी नावाच्या सर्कशीतले जोकर आहेत. या आधी भाजपा सरकारवर केलेले फोन टॅपिंगचे आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत,आता सुशांतप्रकरणी त्यांनी बोगस अकाउंटचा आरोप केला आहे. आरोप सिद्ध करा नाही तर जनतेची माफी मागून तोंड काळे करा… pic.twitter.com/Qv7WAkaCMU
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 6, 2020
Read Also
आघाडीत बिघाडी ! प्रकल्पावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये ठिणगीhttps://t.co/UIKqCQ6I6v#Mahavikasaaghadi #Shivsena #Congres
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 6, 2020