मुंबई – सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये कार्यक्रमासाठी गेले असताना जयंत पाटील यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्रिपदाबाबतचं आपलं स्वप्न उघड केलं. जयंत पाटलांच्या या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
जयंत पाटील यांच्या या वतकव्यांनंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. आता महाविकास आघाडीत फक्त राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडायची बाकी आहेत, असा टोमणा भातखळकरांनी मारला. “
गेली 20 वर्ष राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणे हे नक्कीच ‘दिवास्वप्न’ नाही, तर राजकारणातील शक्तीने हे स्वप्न हस्तगत करणं हेच आपलं उद्दिष्ट आहे” असं जयंत पाटील म्हणाले होते. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मोजक्या शब्दात ट्विटरवर प्रतिक्रिया दिली, मात्र महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्याचं काम केलं.
मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहातोय; जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट…
आता महा विकास आघाडीत फक्त रोहित पवारांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडायची बाकी आहेत… pic.twitter.com/jsF9yKgCfN— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 21, 2021