मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात 1 मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद राहणार आहे. कोरोना संसर्गाची साखळी मोडण्यासाठी ठाकरे सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. लॉकडाऊनच्या काळात गरजूंना मोफत शिवभोजन थाळी दिली जाणार आहे. मात्र यावरून आता भाजपने प्रश्न उपस्थित केले आहेत.
संचारबंदीत शिवभोजन थाळी खाण्यासाठी विशेष पास जारी करणार आहेत का?
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 13, 2021
संचारबंदीत शिवभोजन थाळी खाण्यासाठी विशेष पास जारी करणार आहेत का?, असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.
राज्यात शिवभोजन योजनेतून गरजूंना एक महिना शिवभोजन थाळी मोफत देण्यात येतील. सुमारे दोन लाख थाळ्या देण्याचे ठाकरे सरकारचे नियोजन आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये शिवभोजन थाळी कोण घेणार ? असा सवाल भाजपकडून विचारला जात आहे.
कडक संचारबंदी लागू असताना लोक #शिवथाळी खायला जाणार कसे? का #वसूलीसरकार चा पैसे मोजणाऱ्या मशीनला व्यस्त ठेवण्यासाठी नवीन प्रयत्न? #vajhegang
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) April 14, 2021
कडक संचारबंदी लागू असताना लोक शिवथाळी खायला जाणार कसे? का वसूली सरकारच्या पैसे मोजणाऱ्या मशीनला व्यस्त ठेवण्यासाठी नवीन प्रयत्न?, असा उपरोधिक सवाल भाजप नेते राम कदम यांनी केला आहे.