मुंबई : राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घोषित झाली आहे. या सहा जागांमध्ये महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी भाजपकडून आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संजय उपाध्याय राज्यसभेवर निवडून जाणे हे आमच्यासाठी भूषावह असून उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपला फायदा होईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.
शिवसैनिकांची नार्को टेस्ट करा, त्यातुन राष्ट्रवादीसोबत युती नको हाच आवाज येईल – सुधीर मुनगंटीवार
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे राजीव सातव एप्रिल २०२० मध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेले होते. मात्र, याच वर्षी १६ मे रोजी त्यांचे निधन झाले. त्यांची राज्यसभेची मुदत एप्रिल २०२६ मध्ये संपणार होती. आता पोटनिवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवाराला जवळपास पाच वर्षे मिळणार आहेत. आघाडीत ही जागा काँग्रेसकडून लढवली जाणार आहे, तर भाजपकडून संजय उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी येत्या चार ऑक्टोबरला मतदान पार पडणार आहे.
कोण आहेत संजय उपाध्याय?
संजय उपाध्याय यांच्या राजकारणाची सुरुवात भाजयुमोपासून झाली. काही काळ ते भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवरही होते. आता ते भाजपचे मुंबई सरचिटणीस आहेत. तसेच उत्तर भारतीयांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे. संजय यांच्या वडिलांचं नाव रामभक्त आहे. त्यांच्या वडिलांनी अयोध्येच्या राममंदिराचं भूमिपूजन केलं आहे. त्यामुळे ते राज्यसभेवर निवडून जाणं आमच्यासाठी भूषावह आहे. संजय उपाध्याय हे राज्यसभेवर निवडून जाणे हे येत्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठी देखील फायदेशीर ठरणार आहे. त्यांच्यामुळे नक्कीच उत्तर प्रदेशाच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपला फायदा होईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
Read Also :
- वॉर्ड-प्रभागांची कितीही ढवळाढवळ करा, मुंबई महापालिकेवर भाजपचेच कमळ फुलणार – फडणवीस
- चंद्रकांत पाटीलांवर सव्वा रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार – संजय राऊत
- ‘सामना’चे धन्यवाद! चंद्रकांतदादांच्या लेखणीला फेस! अग्रलेखाला दिलेलं उत्तर जसंच्या तसं छापलं!
- पुण्यातील कात्रज चौकातील ६ पदरी उड्डाणपुलाचे शुक्रवारी भूमीपूजन; योगेश टिळेकरांच्या पाठपूरवठ्याला यश
- मोठी बातमी : अखेर मंत्री अनिल परब यांचा किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा दावा दाखल